"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती क्रं. 305

  *❒ अभिनेते शशी कपूर ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १८ मार्च १९३८, कलकत्ता
●मृत्यू :~ ४ डिसेंबर २०१७ मुंबई,
◆इतर नावे :~ बलबीर
◆कार्यक्षेत्र :~ अभिनय
◆कारकीर्दीचा काळ ~【१९४२ - १९९९】
◆प्रमुख चित्रपट :~ जब जब फूल खिले, प्यार का मौसम
★पुरस्कार :~ पद्मभूषण (२०११), दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१४)

     शशी कपूर हे बॉलीवूडचे पितामह पृथ्वीराज कपूर  यांचे सुपुत्र होते. शशी कपूर यांचे मूळ नाव बलबीर राज कपूर होते.  हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे त्यांच्या घरात पहिल्यापासून सिनेमा होताच.

    शशी कपूर यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण हे चाईल्ड अ‍ॅक्टर म्हणून झाले होते. राज कपूर यांच्या आवारा आणि आग चित्रपटांमध्ये त्यांनी चाईल्ड अ‍ॅक्टर म्हणून काम केलं आहे. 

    शशी कपूर यांचे शशी कपूर यांचे खरे नाव बलबीरराज कपूर होते. त्यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. १९४०मध्ये शशीराज, १९४१मध्ये मीना आणि १९४५मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांतील महत्त्वाचे चित्रपट म्हणजे १९४८मध्ये आलेला आग आणि १९५१मध्ये आलेला आवारा. १९४० ते १९५४ या काळात त्यांनी १९ चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

    २०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.

    त्यांच्या पत्नी जेनिफर यांचे १९८४ साली कर्करोगाने निधन झाले.

   अभिनेते शशी कपूर यांचे मुंबईत ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. बरेच दिवस शशी कपूर आजारी होते.

            ■ पुरस्कार ■
   भारत सरकारच्या  पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना २०११ साली  गौरवण्यात आले होते. तसेच २०१४ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले होते.

No comments:

Post a Comment