"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

महात्मा गांधी


 ★ राष्ट्रपिता महात्मा गांधी ★ 
   भारतीय स्वातंत्र्यलढयातील अग्रणी नेते....  

      मोहनदास करमचंद गांधी    
        गांधी जयंती हा महात्मा गांधी जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती हा भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस "जागतिक अहिंसा दिन" म्हणून स्वीकारला आहे.

🔸जन्म:~ २ ऑक्टोबर १८६९, पोरबंदर, काठियावाड, भारत
🔹मृत्यू: ~ ३० जानेवारी १९४८.नवी दिल्ली, भारत
🔸प्रमुख स्मारक:~ राजघाट
🔹प्रभाव:~ लिओ टॉलस्टॉय, जॉन रस्किन, गोपाळ कृष्ण गोखले
🔸पत्नी नाव:~ कस्तुरबा गांधी

             
      मोहनदास करमचंद गांधी    
       ━═•●◆●★★●◆●•═━
    🔶हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.
  ~~●~~~~~~~~●~~

महात्मा गांधी याचा जिवन परिचय व सूत्रसंचालन
महात्मा गांधी जयंती निमीत्त मराठी भाषणे.
महात्मा गांधी जयंती निमीत्त इंग्रजी भाषणे.
महात्मा गांधी जयंती निमीत्त हिन्दी भाषणे.
⛔Pdf डाऊनलोडसाठी खाली ⏬⏬⏬ क्लिक करा...


  ~~●~~~~~~~~●~~
    🔷असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.

   म.गांधीची कामगिरी CLICK HERE  

    🔶गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यानी खेड्यांना खर्‍या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.

   🔷त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधीजीनी हिंदू मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले.

   🔶 २ ऑकटोबार हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून पाळला जातो.

     🔷गांधींचे तत्त्वज्ञान निव्वळ पुस्तकी नव्हते तर ते उपयोगिता वादात्मक (प्राप्त परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांचे आचरण करणारे) होते.
 ◆महात्मा गांधीनी लिहिलेली पुस्तके ◆

▪ Indian Home Rule (हिंद स्वराज्य)
▪ गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
▪ गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत
▪ गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
▪ गांधी विचार दर्शन : राजकारण
▪ गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग
▪ गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
▪ गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
▪ गांधी विचार दर्शन : हरिजन
▪ नैतिक धर्म
▪ माझ्या स्वप्नांचा भारत

  ~~●~~~~~~~~●~~
 भारत देशाला जय जवान जय किसान हा मंत्र देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान
           *❒ लाल बहादूर शास्त्री ❒*  



  ~~●~~~~~~~~●~~



No comments:

Post a Comment