अग्निबाणाचे शोधक - मिसाईल मॅन म्हणून ख्याती मिळवलेले..

◆राष्ट्रपती कार्यकाळ :~ (२५ जुलै२००२ ते २५ जुलै२००७)
●जन्म :~ १५ ऑक्टोबर १९३१
●मृत्यू :~ २७ जुलै, २०१५
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
pdf स्वरूपात DOUNLOAD ⏬⏬⟱⏬⏬ करा....
❂~✧~~●~●★●~●~~✧~❂
❂~✧~~●~●★●~●~~✧~❂◆~~~●~~●◆●~~●~~~◆
पुस्तकाविषयी प्रेरणादायी विचार...
डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
●════════════════●
★"वाचन प्रेरणा दिन..."★
१५ आॕक्टोबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते.
आदरणीय डॉ. अब्दूल कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.
बालपण अत्यंत परिश्रमात व्यतित करून अखंड ज्ञानाची साधना करणाऱ्या डॉक्टर कलाम यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पदमश्री, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता, रामानुजन, यासारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. किंग चार्ल्स दुसरा पदक,हुवर पदक देऊन त्यांचा जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला गेला.यु के,सिंगापूर, अण्णा युनिव्हर्सिटी यांनी त्यांचा डॉक्टरेट देऊन सन्मान केला. स्वतंत्र भारताचे 11 वे राष्ट्रपती झाले हा मान प्रथमच एका शास्त्रज्ञ व्यक्तीला मिळाला होता.
देशाच्यासुरक्षितेच्या दृष्टीने त्यांनी अनेक मोहीम यशस्वीकेल्या. अर्जुन रणगाडा, लाईट कॉबॉट एअर क्राफ्ट,त्रिशूल व पृथ्वी हेअग्निबाण आकाश, नाग, अग्नी, ब्रह्मोस प्रक्षेपण अस्त्रे या सर्व निर्मितीत त्यांचा वाटा मोलाचा होता.राजस्थान मधील पोखरणची अणुचाचणी यशस्वी करताना त्यांनी देश अण्वस्त्र अणुशक्ती संपन्न बनवला.
इंडिया माय ड्रीम, टर्निंग पॉईंट, टार्गेट मिलेनियन, साइंटिस्ट टू प्रेसिडेंट यासांरखी त्यांची अनेक पुस्तके गाजली.मराठी भाषेत अग्निपंख हे त्यांच्या जीवनावरील पुस्तक प्रचंड लोकप्रिय झाले.पुढिल वीस वर्षांचे आधुनिक भारताचे स्वप्न पाहणाऱ्या या माणसाचे अनेक युवक युवती प्रचंड चाहते होते.इतक्या बुद्धिमान माणसाचा व्याख्यान देता देता शेवट होणे यासारखे परमभाग्य ते काय असणार. डॉक्टर कलाम यांचे आयुष्य कष्टमय होते पण ते लढले आणि जिंकलेही. त्यांचे जीवन आपल्यालाही सतत हेच सांगत राहते की येणाऱ्या आव्हानांना भिडायची तयारी असेल तर समोरचा प्रसंग कितीही बाका असेल तरी तुम्हाला प्रचंड, दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जोरावर कठीण आयुष्याची लढाई जिंकता येते.
पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आमच्या शाळेत "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आली.
वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.
'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे.
लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे.
वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.
❂~✧~~●~●★●~●~~✧~❂
★>>> अग्निपंख >>>★
भारतरत्न अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम
नुसती वर्तमानपत्रे टाकून
नाही होता येत डॉ.कलाम
आणि त्यांच्यासारखी हेअर स्टाईल डोक्यावर ठेवूनही नाही होता येत "मिसाईल मॅन"
त्यासाठी असावी लागते
डोक्यात नशा नवनिर्मितिची
आतून तळमळ, जिद्द
आणि स्वत:च्या लग्नाची तारीख
विसरण्याइतकं झोकून देणं
हाती घेतलेल्या देशकार्यात.
करावा लागतो अठरा तासांचा दिवस अभ्यासासाठी
आणि पाहावी लागतात दिवास्वप्नं
झोप उडवणारी लावून अग्निपंख घ्यावी लागते गनभरारी नव्या दिशेने
अनंत आकाशाच्या मर्यादा तोडण्यासाठी तेव्हा होता येतं डॅा.ए. पी.जे अब्दुल कलाम
यांना विनम्र अभिवादन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
!!वाचाल तरच वाचाल !!
'वाचाल तर वाचाल !' हे ब्रीद मानू या धन,
वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन.
No comments:
Post a Comment