■ नवोपक्रमाचे शीर्षक :-
"स्व ची जाणीव" स्वतःला ओळखा... गुणवत्त्ता विकास, सामाजिक वातावरण व "स्व ची जाणीव" यातील सहसंबंधांचा अभ्यास....
■ प्रस्तावना :-
‘स्व’त्व म्हणजे परिस्थिती, जडणघडण, अनुभव यातून घडलेले, वेगळेपण असणारे आपले व्यक्तित्व, आपल्या अस्तित्वाची जाणीव. स्वत:ला ओळखता आले तर ‘स्व’त्व जपता येते. छोटय़ा मोठय़ा गोष्टीतून जगण्यातला आनंद शोधायला लावणारा हा शोधनिबंध आहे. कलेतले यश हे अनुकरणाने टिकत नाही, तर कलावंताचा कलेतल्या ‘स्व’त्वानेच टिकते. ‘जोपर्यंत तुम्हाला तुमच्या “स्व”ची जाणीव होत नाही तोपर्यंत तुम्ही आपले ध्येय साध्य करू शकत नाही. आपले ध्येय गुणवत्त्ता विकास ठेवून परिस्थितीचा अभ्यास करणे यासाठी हा शोधनिबंध आहे.
जीवनात जेव्हा तुम्हाला ‘प्रगल्भता’ या शब्दाचा अर्थ समजेल तेव्हापासून स्वतःला शोधण्याच्या मागे लागणार. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काय करू शकतो याचे विविध उदाहरणे आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा वारसा अशी दुर्दम्य इच्छाशक्तीचा माणसेच पुढे नेत आहेत. जन्मतःच अंध, बहिरी असूनही आनंदानं आयुष्य जगणारी आणि स्वतःच्या जगण्यातून पुढच्या कित्येक पिढ्यांचे आयुष्य आनंदानं उजळवून टाकणारी हेलन केलर... गलितगात्र अवस्थेतही... असे अनेक जण परिस्थितीशी झगडून यश मिळवतात. याच बाबीवर चिंतन करून गुणवत्ता विकास हे ध्येय साध्य करणे.
आपले "स्व'त्व जाणून घेऊन जिद्दीने आयुष्य जगाणारे किती आहेत? हेलन केलर जन्मापासून अंध. त्यांनी एकदा स्वतःच असा विचार केला मला माझ्या डोळ्यांचा उपयोग करता आला... अगदी तीन दिवसांसाठी... तर मी काय पाहीन? त्यांनी लिहिलय, " माझे जगणे ज्यांच्या दयाळूपणामुळे सुसह्य झाले त्यांना मी पहिल्यांदा बघेन. ज्या पुस्तकांनी आयुष्याचा अर्थ उलगडून दाखवला ती पुस्तके पाहायला मला आवडतील. दुपारी जंगलात फिरेन. रंगांची उधळण करणारा सूर्यास्त दिसावा यासाठी प्रार्थना करीन. दुसऱ्या दिवशी माणसाने केलेली प्रगती पाहायला मला आवडेल. स्पर्शाने माहित झालेल्या गोष्टी मी बघिन. कामात मग्न असलेल्या माणसांमध्ये, आयुष्याचा नेहमीचा जगण्याचा व्यवसाय झपाटून करणाऱ्या माणसांमध्ये मी तिसऱ्या दिवशी असेन.' "स्व'त्वाची जाणीव आतून निर्माण झाली की माणूस काय करू शकतो याचीच ही सर्व उदाहरणे.
बहिणाबाई हे सांगताना सुगरणीचा दाखला देतात. त्या म्हणतात...
तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ।
तुला दिलेरे देवाने दोन हात दहा बोट।
तरीही योग्य वापर नसला की गंज लागण्याची भीती असते. प्रत्येकाने स्मार्ट होणे कालानुरूप गरजेचे झाले आहे.
स्वतःजवळच्या क्षमतांचे योग्य ज्ञान नसल्याने बहुतेक लोक अतिशय सामान्य आणि निरर्थक जीवन जगत असतात. वास्तविक प्रत्येकाच्या आत दडलेल शून्य म्हणजेच ज्ञान होय. त्याचा अनुभव घेतल्यावर तुम्ही आदर्श जीवन जगू शकतात.
हे दडलेलं शून्य म्हणजे तुमच्या शरीराचं आणि जीवनाचं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे. ते प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे. म्हणूनच स्व: ला ओळखा आणि दिलखुलास जगा...
एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा संकलांना,
कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन जग उजळो।
■ नवोपक्रमाची गरज :-
शालेय जीवनात प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना विविध विषयाचे अध्यापन केल्या जाते. शिक्षण प्रणाली ही रचनावादी तत्वांवर आधारलेली आहे. ‘प्रत्येक मूल शिकले पाहिजे’. हा गुणवत्त्ता विकासाचा एकच ध्यास आहे. यात बालकेंद्रित शिक्षणप्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे.
प्रत्येक विषयातील अध्यापन हे फक्त पाठपुस्तकातून न देता प्रत्यक्ष अनुभवातून दिल्यास ते अधिक विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होते. आजच्या रजनावादी शिक्षण प्रणालीमध्ये पुस्तकातून विषय शिकविण्यापेक्षा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी आवडीने शिकणे गरजेचे आहे.
🔵🔴🔵
परंतु किती विद्यार्थी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यात प्रगती करतात ही संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. यासाठी प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्व ची जाणीव करून देऊन त्यांच्या आवडीनुसार कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करुन घेता येते.
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार क्षमतांचा व कौश्यल्यांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी मला या उपक्रमाची गरज भासली. विद्यार्थ्यांमध्ये कृतीस वाव देवून विध्यार्थ्यांमध्ये शमता विकसित करण्यासाठी व सर्व विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार शिकली पाहिजेत यासाठी मी या नवोपक्रमाची निवड केली.
■ नवोपक्रमाची उद्दिष्टे :-
१. ‘स्व’त्व म्हणजे परिस्थिती, जडणघडण, अनुभव याद्वारे स्वत:ला ओळखून ‘स्व’त्व जपणे व विकसित करणे.
२. छोटय़ा मोठय़ा गोष्टीतून जगण्यातला आनंद शोधायला लावणारी भावना विकसित करणे.
३. ‘स्व’त्व सतत जागे ठेवावे लागते हा आत्मविश्वास विकसित करणे.
४. आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत उद्योगी राहणे.
५. सहकार्य, सहानुभूती दृष्टीकोन विकसित करणे.
६. स्वत:ला समजून घेण्याची क्षमता विकसित करणे.
■ नवोपक्रमाची व्याप्ती व मर्यादा :-
१. हा नवोपक्रम जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा घाटकिन्ही तांडा पंचायत समिती दारव्हा या शाळेपुरतेच मर्यादित आहे.
२. “गुणवत्त्ता विकास, सामािजक वातावरण व "स्व ची जाणीव" यातील सहसंबंधांचा अभ्यास....” हा उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे.
३. गुणवत्त्ता विकास, सामािजक वातावरण व "स्व" ची जाणीव ह्या नवोपक्रमत सामाजिक वातावरणानुसार बदल होऊ शकतो.
■ नवोपक्रमाचे नियोजन :-
वर्गातील सर्व विद्यार्थी अध्ययन अध्यापनात एकरूप व्हावे अध्ययनातील निरसता कमी व्हावी याकरिता मी हा नवोपक्रम राबविण्याचे ठरवले.
शिक्षकांनी दिलेले अध्ययन अनुभव हे पुस्तकातील असल्यामुळे परिणामकारक होत नव्हते. अध्यापनाचे कार्य हे शिक्षण केंद्रित होत होते. आजच्या शिक्षण प्रणालीनुसार अध्यापन – अध्ययन प्रक्रिया ही बालकेंद्रित स्वरुपाची असणे आवश्यक आहे. अध्यापनाचे कार्य एकतर्फीच न ठेवता विद्यार्थी व शिक्षकात आंतर्क्रिया घडून यावी व विद्यार्थी अध्ययन अध्यापनात आवडीने सहभागी व्हावा याकरिता नवोपक्रम राबविला.
आनंदाने विद्यार्थी हसत खेळत अध्ययन करू लागलेत. यामुळे मी मुख्याध्यापकाशी चर्चा केली. व हा नवोपक्रम जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा घाटकिन्ही तांडा येथे राबविण्याचे ठरविले.
या नवोपक्रमासाठी जुलै, ऑगस्त, सप्टेंबर, ऑक्टोंबर या चार महिण्यात सदर नवोपक्रम पूर्ण होण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक होते. त्याकरिता काही गोष्टीची आवश्यकता होती. त्यासाठी खालील साधनांचा उपयोग करण्यात आला.
◆ चर्चा
◆ मु. अ./केंद्र प्रमुख परवानगी
◆ पालकांची भेट
◆ सामाजिक परिस्थितीचा अभ्यास
◆ विद्यार्थ्यांच्या स्पर्धा
■ नवोपक्रमाची कार्यपध्दती :-
प्रथमत: इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात आली. विद्यार्थ्यांचे सारख्या आवडीनुसार गट तयार करण्यात आले.
शालेय विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल व त्यांची आवड प्रथम याची माहिती घेण्यात आली.
● माहिती संकलनाची साधने :~
प्रस्तुत संशोधन वर्तमानकाळातील असल्यामुळे माहिती संकलनासाठी प्रश्नावलीचा उपयोग करण्यात आला. यात
• प्रमाणित साधने :-
१) स्वजाणीव वर आधारित प्रश्नावली
२) सामाजिक वातावरणावर आधारित प्रश्नावली.
• केंद्रिय प्रवृत्तीचे मापन करण्यासाठी -सरासरी
• विचलन मोजण्यासाठी -प्रमाण विचलन टक्केवारीचा उपयोग करण्यात आला.
काही विद्यार्थी अबोल तर काही अभ्यासात मागे असलेले व काही मुलात न मिसळणारे विद्यार्थी यांच्या घरातील परिस्थिती व सामाजिक वातावरण याचे निरीक्षण व अभ्यास करण्याचे ठरवले.
काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची परंतु अभ्यासाविषयी आवड असणारे काही विद्यार्थी आढळले. तर काही विद्यार्थ्यांच्या घरी शैक्षणिक वातावरणाचा अभाव आढळला.
वर्गातील विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट व त्यानुसार बैठक व्यवस्था करण्यात आली. यातून त्यांच्यामध्ये जी आवड आहे त्याबाबत प्रथम त्यांना आठवडाभर कार्य देण्यात आले. सहाजिकच त्यांना शाळेची गोडी वाटायला लागली. विद्यार्थ्यांचे गैरहजेरीचे प्रमाण कमी झाले. घरी राहणारे मुलेसुद्धा रोज शाळेत यायला लागली व आज मला काहीतरी शिक्षकांना नवीन करून दाखवायचे ही जिद्द त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली.
याचा फायदा असा झाला की विद्यार्थी त्यांना आवड असणाऱ्या गोष्टी सोबतच शालेय अभ्यासक्रम याबाबत सुद्धा त्यांच्यात आवड निर्माण झाली. एकमेकाला सहकार्य करण्याची भावना त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. सारखी आवड असणारे विद्यार्थी एकमेकांचे पाहून आणखी चांगले सादरीकरण करण्याचे प्रयत्न करू लागले.
■ उपक्रमातील नाविन्यता :-
१. विद्यार्थांमध्ये कार्यकुशलता निर्माण झाली.
२. उपक्रमाचे साहित्य व व इतर गोष्टींची जपणूक व योग्य वापर करण्याची भावना निर्माण झाली.
३. प्रत्येक विद्यार्थी आवडीनुसार नवनवीन गोष्टी शिकून त्याबाबत माहिती गोळा करायला लागले.
४. आवडीनुसार गट तयार केल्यामुळे सहकार्य भावना विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात रुजू लागली.
५. विद्यार्थी त्याला आवडणाऱ्या गोष्टी चा सहसंबंध विषय घटका सोबत जुळवायला लागले.
६. परिसरातील निरीक्षणातून विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाला नवीन ज्ञानाची सांगड घालता आली.
७. या उपक्रमामुळे विद्यार्थी उपस्थिती चे प्रमाण वाढले.
■ यशस्विता :-
नवोपक्रमासाठी मी “गुणवत्त्ता विकास, सामािजक वातावरण व "स्व ची जाणीव" यातील सहसंबंधांचा अभ्यास....” या विषयाची निवड केली. जुलै ते ऑक्टोंबर या कालावधीत मी हा नवोपक्रम पूर्ण केला. यासाठी विद्यार्थ्यांचे कौटुंबिक निरीक्षण, सामाजिक परिसर निरीक्षण, निष्कर्ष, स्वच्छतेचे महत्त्व, प्रबोधन रॅली, व्याख्याने, मैदानी स्पर्धा, वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले.
१. स्वत:ला समजून घेण्याची क्षमता विकसित होण्यास मदत झाली.
२. शैक्षणिक गुणवत्ते साठी विविध उपक्रमांचे आयोजन शासन स्तरावर केले जाते याकरिता विद्यार्थी प्रतिसाद वाढला
३. गुणवत्ता विकास, सामाजिक वातावरण तसेच शालेय वातावरणा बाबत पालक जागृत झाले.
४. विदयार्थ्यांच्या स्वजाणीवेचा विदयार्थ्यांच्या सहशालेय उपक्रमांतील सहभाग, नैतिक मूल्य, व्यक्तिमत्त्व, त्याच्या भावना, स्वअभ्यास सवयी यावर प्रभाव पडतो.
५. शालेय विविध कार्यक्रमाबाबत अभिरूची निर्माण होण्यास मदत झाली.
६. सामाजिक वातावरणाचा प्रभाव विदयार्थ्यांच्या स्वजाणीवेवर होत असतो.
७. लिंग निहाय सामाजिक वातावरण आणि स्वजाणीव यांतील परस्परसंबंधाचा विचार करता इयत्ता पाचवी ते सातवीच्या बाबतीतही मध्यम स्वरूपाचा परिणाम दिसुन येतो.
८. सामाजिक वातावरणातील कौटुंबिक वातावरणाचा प्रभाव विदयार्थी स्वजाणीवेवर होतो.
★ नवोपक्रम सादरकर्ते :~
श्री. सतिष शंकरराव बोरखडे सहा.शिक्षक, एम. ए. (राज्य), बी. एड.
जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा घाटकिन्ही तांडा पं.स. दारव्हा जिल्हा यवतमाळ पिन- 445202
मो.नं.- 7875840455
No comments:
Post a Comment