"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

⧭ गुरुपोर्णिमा ⧭

     गुरुपोर्णिमा संपूर्ण माहिती  


गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..  
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. 
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. 
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. 
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. 
आजपर्यंत कळत - नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन..!!! 
*गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*
💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
     आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्या सद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे.

      आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत. मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

     नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्त नरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू.

   अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे.
सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन.

    आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्य ही आहे. ह्य दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.

सद्गुरू सारीखा असता पाठीराखा ।
इतरांची लेखा कोण करी ॥
किंवा
सद्गुरू वाचोनी सापडेना सोय ।
धरावे जे पाय आधी आधी ॥

       ही आपल्या मनावर केलेली खोल नोंदणी आहे. गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत.
उदा : व्यास आणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ. ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलं देतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे. नारळ हार पेढे शाल गुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानं गुरूंना केलेत नमन. त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती. असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासक ह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असते.

        त्या कृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याच उदा. म्हणजे निवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाच कार्य.

       गुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी. महर्षी व्यास ह्यांना जगद्गुरू मानतात. त्यामुळेच कांही जण ह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात. गुरूला अनन्य भावे शरण जाणाऱ्या. गुरू महती कळालेल्या अनुभवलेल्या प्रत्ययी आलेल्या शिष्य मुखातून मग हेच विश्वास पूर्ण शब्द बाहेर येतात की..
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢◆◆◆◆¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢

 गुरुपौर्णिमेचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या गुरुंप्रती प्रती कृतज्ञना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. 

    गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

     आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण जीवनात काही तरी करतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत कायम आहे. त्यामुळे व्यासमुनींना आठवले पाहिजे.

     ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. शास्त्रात त्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे कथन आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.

    व्यासांच्या कार्यामुळे त्यांना 'वेदव्यास' असे देखील म्हणतात. तसेच व्यासमुनी उच्चासनावर बसून वेदांचे अर्थ सांगत त्यामुळे आजही सभेत वक्ता बोलतो त्या जागेला 'व्यासपीठ' असे म्हणतात.

   ●स्मरण करूया :~ आपली सर्वांची सर्वात पहिली गुरु म्हणजे आई. त्यानंतर वेळोवेळी योग्य ती शिकवण देणारे वडील, शिक्षक हे देखील आपले गुरु आहेत. मग आयुष्यात विविध टप्प्यांवर गुरुंची गाठ पडत जाते. 

    गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने याचे चिंतन करायला हवे की, “ हे ज्ञान मिळायच्या आधी आपण कुठे होतो? आता कुठे आहे? पूर्वी या ज्ञानाशिवाय आपण कुठे होता? यातला फरक लक्षात आला की कृतज्ञता भाव येतो.


    गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंना काहीही भेटवस्तू दिली तरी खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जी शिकवण दिली आहे, त्याचे प्रत्यक्षात आचरणात आणणे ही आहे.
■■■●●●●●■■■●●●●●■■■

No comments:

Post a Comment