━━═•●◆●★◆★●◆●•═━━
स्वामी विवेकानंद आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगत असलेली ही गोष्ट.
एकदा एका जंगला मध्ये एक वाघच पिल्लू वाघिणी पासून हरवले आणि मेंढ्यांच्या कळपात जावून मिसळले. हळू हळू ते पिल्लू त्या कळपातच वाढू लागले आणि तिथेच मोठे झाले. ते पिलू मेंढ्या प्रमाणेच गवत खायचे, बे बे करायचे, आणि भीती वाटली कि पळून जायचे.
त्याच्या सुदैवाने एक दिवस त्याची दुसऱ्या वाघाशी भेट झाली तेव्हा त्याला कळले की तो एक शक्तिशाली वाघ आहे.
तेव्हा पासून त्याचे बे बे करणे, गवत खाणे, भीतीने पळून जाणे बंद झाले.
🌀❝ तात्पर्य ❞ ::~ स्वतःला ओळखा, प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रचंड शक्ती आहे.
No comments:
Post a Comment