"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*08/08/18 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 08/08/2018 ❂*
       *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

 🍥 *08. ऑगस्ट :: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              आषाढ कृ. १२
     तिथी : कृष्ण पक्ष द्वादशी,
            नक्षत्र : मृगशीर्ष,
    योग : हर्शन,  करण : कौलव,
सूर्योदय : 06:17, सूर्यास्त : 19:10,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08. *अडला हरी गाढवाचे पाय धरी*
  ★ अर्थ ::~ अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08.   *मातृदेवो भव ।*
⭐अर्थ ::~ मातेला देवाप्रमाणे पहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

 🛡 ★ 08. ऑगस्ट ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ भारत छोडो दिन
★ हा या वर्षातील २२० वा (लीप वर्षातील २२१ वा) दिवस आहे.
 
         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००८ : चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
●१९९४ : पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय सुरू केले.
●१९८५ : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’ध्रुव’ ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.
●१९४२ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात ’चले जाव’ चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी ’करेंगे या मरेंगे’ हा संदेश दिला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४० : दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू
◆१९३२ : दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक
◆१९२६ : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांच्या अनेक कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे. 

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : गजानन नरहर सरपोतदार – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
●१९९८ : डॉ. सुमती क्षेत्रमाडे – वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन साहित्यिक अभिरुची जोपासणार्‍या लेखिका व कादंबरीकार. त्यांनी चौदा कादंबर्‍या दोन नाटके व काही कथा लिहिल्या.
●१८९७ : व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08.  *✸ बहु असोत सुंदर ✸*
     ●●●●●००००००●●●●●
बहु असोत सुंदर संपन्‍न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथले तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें
सद्‍भावांचीच भव्य दिव्य आगरें
रत्‍नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा

नग्‍न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवें स्वार जेथले
भासत शतगुणित जरी असति एकले
यन्‍नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा

गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो
स्फूर्ति दीप्‍ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *❂ दिवा पाहुनि लक्ष्मी येते ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दिवा पाहुनि लक्ष्मी येते
करु तिची प्रार्थना, करु तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो,
शुभंकरोति म्हणा ॥
 शुंभकरोति कल्याणम्‌,
शुभंकरोति कल्याणम्‌ ॥१॥

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशा दिशांतुनि या लक्ष्मीच्या
दिसती पाऊलखुणा – शुभंकरोति म्हणा, मुलांनो, … ॥२॥

या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता
सौख्य मिळे जीवना – शुभंकरोति म्हणा, मुलांनो,….॥३॥

दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानीं कुंडल मोतिहार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08.  *❃ फसवेगिरीl ❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
       एक शेळी चरण्यासाठी रानात निघाली तेव्हा तिने आपल्या करडास सांगितले. 'बाळ, आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे आणि मी, 'सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो' असं म्हटलं की दार उघड. इतर कोणाला दार उघडू नको !'

हे सर्व बोलणे एक लांडगा ऐकत होता. शेळी निघून गेल्यावर तो खोपटाच्या दाराशी येऊन म्हणाला, 'सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश होवो !'

त्याला वाटले आता करडू दार उघडेल. परंतु त्याचा आवाज करडाने ओळखला व ते खिडकीतूनच लांडग्याला म्हणाले, 'तू जर बोकड आहेस तर तुला दाढी कशी नाही ?'

हा प्रश्न ऐकून लांडगा निमूटपणे निघून गेला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    फसवेगिरी करणार्‍या माणसा संबंधी, तसेच  दिशाभूल करून सभादाची फसणूक करणार्‍या नेते मंडळी पासून सर्व सामान्य सभासदांनी नेहमी सावध असावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08.    जी माणसं "दुसऱ्याच्या"
     चेहऱ्यावर आनंद निर्माण
 करण्याची क्षमता ठेवतात,

   ईश्वर "त्यांच्या" चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही.
आणि म्हणूनच ती समाधानी असतात.   
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

08. *✿महत्वाचे पदावरील व्यक्ती✿*
        ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
● केन्द्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) - अध्यक्ष,   *::~ श्री सुशील चंद्रा*

● केन्द्रीय उत्पाद एवं सीमा शुल्क बोर्ड (Central Board of Excise and Customs)अध्यक्ष,
       *::~नजीब शाह*

● भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (Competition Commission of India) - अध्यक्ष,
    *::~ देवेन्द्र कुमार सीकरी*

● केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण (Central Administrative Tribunal) - अध्यक्ष,
     *::~  प्रमोद कोहली*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ महत्वपूर्ण दिवस ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

08.  *भारत छोड़ो आन्दोलन*
 ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
   भारत छोड़ो आन्दोलन विश्वविख्यात काकोरी काण्ड के ठीक सत्रह साल बाद भारतीय स्वतंत्रता संग्राम के दौरान ९ अगस्त सन १९४२ को गांधीजी के आह्वान पर समूचे देश में एक साथ आरम्भ हुआ। यह भारत को तुरन्त आजाद करने के लिये अंग्रेजी शासन के विरुद्ध एक सविनय अवज्ञा आन्दोलन था। क्रिप्स मिशन की विफ़लता के बाद महात्मा गाँधी ने ब्रिटिश शासन के खिलाफ़ अपना तीसरा बड़ा आंदोलन छेड़ने का फ़ैसला लिया। 8 अगस्त 1942 की शाम को बम्बई में अखिल भारतीय काँगेस कमेटी के बम्बई सत्र में 'अंग्रेजों भारत छोड़ो' का नाम दिया गया था। हालांकि गाँधी जी को फ़ौरन गिरफ़्तार कर लिया गया था लेकिन देश भर के युवा कार्यकर्ता हड़तालों और तोड़फ़ोड़ की कार्रवाइयों के जरिए आंदोलन चलाते रहे। कांग्रेस में जयप्रकाश नारायण जैसे समाजवादी सदस्य भूमिगत प्रतिरोधि गतिविधियों में सबसे ज्यादा सक्रिय थे। पश्चिम में सतारा और पूर्व में मेदिनीपुर जैसे कई जिलों में स्वतंत्र सरकार, प्रतिसरकार की स्थापना कर दी गई थी। अंग्रेजों ने आंदोलन के प्रति काफ़ी सख्त रवैया अपनाया फ़िर भी इस विद्रोह को दबाने में सरकार को साल भर से ज्यादा समय लग गया।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार ~ 08/08/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment