"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*11/06/18 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 11/06/2018 ❂*
       *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *11. जून :: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
          अधिक जेष्ठ कृ. १२
       तिथी : कृष्ण पक्ष द्वादशी,
             नक्षत्र : भरणी,
    योग : अतिगंड,करण : तैतिल,
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:15,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11. *दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ*
      *★ अर्थ ::~* दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *सर्वेऽपि सुखिन: सन्तु ।*
          ⭐अर्थ ::~
 जगात सगळे सुखी असोत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★11. जून ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १६२ वा (लीप वर्षातील १६३ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : बांगलादेशातील चितगावमधे भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
●१९९७ : पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत 'सुखोई-३० के' ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली.
●१९३७ : जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.
●१८६६ : अलाहाबाद उच्‍च न्यायालयाची स्थापना
●१६६५ : मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४७ : लालूप्रसाद यादव – केंद्रीय मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री
◆१८९७ : राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक
◆१८९४ : काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : राजेश पायलट – केंद्रीय मंत्री
●१९९७ : मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय
●१९५० : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
●१९२४ : वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी
●१७२७ : जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा. याला इंग्लिश आजिबात येत नसे व तो दुभाषांमार्फत दरबार्‍याशी संपर्क साधत असे किंवा लॅटिनमध्ये त्याचे म्हणणे मांडत असे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11.  *❃❝ विश्वासघात ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही. शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला. हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला, एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला. तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली. पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली. वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ?

    तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय."

माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता. रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला,   "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."  पण अस्वलानं तसं केलं नाही.
थोड्या वेळानं माणसाला जाग आली. मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली. तो माणसाला म्हणाला,  "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल."

    माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला. सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही व फांदी हालून माणूस वाघाच्या तावडीत पडला.
    पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला. ते म्हणालं,
"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला  फसवलस.
      सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणा-या असतात, याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण  आयुष्यभर संपत नाही..!!

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
 पाठीत खंजीर खुपसुन...
       कोणाचेही भले झाले नाही.
     ज्याचे कर्म चांगले आहे...
            तो कधी संपत नसतो..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *ठेचतर लागत राहणार ती पचवायची  हिम्मत ठेवा...* 
*कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची  किंमत ठेवा...*
*माणसाला स्वतःचा "फोटो"* *काढायला  वेळ लागत नाही...*               
      "पण स्वतःची इमेज"
*बनवायला खूप वेळ लागतो...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

11. *✿ महाराष्ट्रातील लेण्या ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
◆ भटाळा लेणी -- चंद्रपूर जिल्हा.

◆ एलिफंटा लेणी -- एलिफंटा द्विप, मुंबई.

◆ वेरूळ लेणी - औरंगाबाद जिल्हा.

◆ गांधारपाले लेणी --रायगड जिल्हा.

◆ घटोत्कच लेणी -- औरंगाबाद जिल्हा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

11. ★ पांडुरंग सदाशिव साने ★
        ┄─┅•●●●◆●●●•┅─┄
🔸टोपणनाव: साने गुरुजी
🔹जन्म :~ २४ डिसेंबर १८९९
पालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र

🔸मृत्यू : ~ ११ जून १९५०
          के.ई.एम.रुग्णालय मुंबई
🔹चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

      *पांडुरंग सदाशिव साने
         ऊर्फ साने गुरुजी*

    हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपूल साहित्य प्रसिद्ध आहे.

     त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.

     शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
      १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या.

    समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.

     मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात.

     त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली.

    करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम  होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ सोमवार ~ 11/06/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment