*15/07/18 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 15/07/2018 ❂*
*🔘 वार ~ रविवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *15. जुलै :: रविवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
आषाढ शु. ३
तिथी : शुक्ल पक्ष तृतिया,
नक्षत्र : अश्लेषा,
योग : सिद्धि, करण : तैतिल,
सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15. *अचाट खाणे अन मसणात जाणे* ★ अर्थ ::~
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *चक्रवत् परिवर्तन्ते दु:खानि च सुखानि च ।*
⭐अर्थ ::~ सुखदु:खे चाकाप्रमाणे पालटत असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
*🛡 ★ 15. जुलै ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १९६ वा (लीप वर्षातील १९७ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९७ : पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड
●१९९६ : स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
●१९५५ : पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
●१९५५ : आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२७ : प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
◆१९०५ : चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान
◆१९०४ : गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
◆१९०३ : के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री
◆१६११ : मिर्झा राजे जयसिंग
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार,
●१९९९ : इंदुताई टिळक – सामाजिक कार्यकर्त्या
●१९९८ : ताराचंद परमार – गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक
●१९९१ : जगन्नाथराव जोशी – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते
●१९६७ : नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ – गायक व नट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *✸ आता उठवू सारे रान ✸*
●●●●●००००००●●●●●
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान
कोण आम्हां अडवील, कोण आम्हां रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण
शेतकर्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *❂ हनुमान वंदना ❂*
━═●✶✹★●★✹✶●═━
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम्।
दनुजवनकृषानुम् ज्ञानिनांग्रगणयम्।
सकलगुणनिधानं वानराणामधीशम्।
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥
मनोजवं मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15. *❝ असंगाचा संग ❞*
━━═•●◆●★●◆●•═━━
एका गृहस्थाकडे एक बैल होता. तो संध्याकाळी इतर गुरांबरोबर नेहमी वेळेवर घरी जायचा.
परंतु एके दिवशी तो घरी न येता दुस-या बैलांबरोबर एका शेजा-याच्या वाडयात निघून गेला. वाडयात शिरल्यावर पोटभर खाऊन मनमुराद नासधूस करून इतर बैल विश्रांती घेत होते व तेथेच थोडा वेळ शांत बसले .
इतक्यात वाडयाचा मालक काठी हातात घेऊन धावत आला.
*तेथील बैलांना नेहमीचीच सवय असल्याकारणाने मालकाला चुकवून ते मार न खाता एकदम पसार झाले .*
परंतु त्या गरीब बैलाला असली मुळीच सवय नसल्यामुळे कोणत्या बाजूने पळून जावे हे त्याला सुचेना , आणि अखेरीस बराच चोप दिल्यावर मालकाने त्याला जाऊ दिले.
मध्यरात्री घरी आल्यावर त्याचा मालक त्याला पाहण्यास आला बैलाच्या पाठीवर वळ त्याच्या दृष्टीस पडले.
मालकाने त्या माराचे कारण मनात समजून एक भले मोठे लोढणे त्याच्या गळ्यात अडकवून दिले. जेणेकरून त्याला पळता येईना. अर्थातच त्यानंतर तो कधी दुसर्याच्या वाडयात शिरलाही नाही..
सद्गुणी असतानाही एका प्रसंगाने त्याच्या गळ्यात कायमचे लोढणे अडकले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
असंगाचा संग करण्याच्या दोषाने चांगल्या बुद्धीला भ्रम झाला
*कुसंगती थोडा वेळ जरी प्राप्त झाली तरी ती अब्रुला हानीकारक होते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *जो सूर्य* मला *उन्हाळ्यात*
नकोस वाटतो..
तोच *सूर्य* मला *हिवाळ्यामध्ये*
किती *हवा हवासा वाटतो*,
तसेच *माणूस* देखील
*सुखामध्ये* जवळच्या *नात्यांना*
विसरतो पण *दुःखाच्या क्षणी*
तीच *नाती हवी हवीशी वाटतात...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *✿महत्वाचे पदावरील व्यक्ती✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
● भारतीय प्रतिभूति एवं विनियामक बोर्ड (SEBI) ::~ अध्यक्ष,
::~ यू.के. सिन्हा
● राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक (NABARD) - अध्यक्ष,
::~ डॉ हर्ष कुमार भानवाला
● (SBI) - अध्यक्ष,
::~ अरुन्धति भट्टाचार्य
● भारतीय औद्योगिक विकास बैंक (IDBI) - अध्यक्ष, ::~ किशोर खरात
● (Company Law Board) - अध्यक्ष, ::~ श्री महेश मित्तलकुमार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15. *❒ डॉ. विजय भाटकर ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
विजय पांडुरंग भटकर यांचा
जन्म ११ ऑक्टोबर १९४६ झाला.
हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा या गावाचे. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे आणि पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांना परदेशी नोकऱ्यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते. विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार’ साठी १९७२ साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८० ते१९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. १९९२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत १९८७ मध्ये उपाध्यक्ष झाले.
भारताने अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात २ जून १९८८ रोजी केली. भटकर हे तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट सेंटर’चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला काम करीत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. असे असून, डॉ.विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. भटकरांनी १९९३ मध्ये परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.
त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी ‘एज्युकेशन टू होम’ (इटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली.
भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या. विज्ञान व तंत्रज्ञानात रमणारा हा शास्त्रज्ञ भारतीय संस्कृती, वेद-उपनिषदे, संत साहित्य व अध्यात्म विचार यांच्यातही रस घेणारा आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी यातायात कमी व्हावी, या विचाराने त्यांनी सी-डॅक मधून मुक्त होऊन ‘एज्युकेशन टु होम’ (ETH) या प्रकल्पाला वाहून घेतले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जबाबदार्या सांभाळताना त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. केंद्र शासनाने त्यांना पद्मश्रीने गौरविले, तर महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित बहुमान केला. ७० हून अधिक शोधनिबंध व आठ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. युरोपिअन संस्कृतीचा अभ्यास करणारे, तसेच आध्यात्मिक अनुभूतीसाठी ध्यानधारणा करणारे व आजही सक्षमतेने कार्यरत असलेले डॉ. विजय भाटकर भारतीय युवकांचे आदर्श ठरलेले आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ रविवार ~ 15/07/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 15/07/2018 ❂*
*🔘 वार ~ रविवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *15. जुलै :: रविवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
आषाढ शु. ३
तिथी : शुक्ल पक्ष तृतिया,
नक्षत्र : अश्लेषा,
योग : सिद्धि, करण : तैतिल,
सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15. *अचाट खाणे अन मसणात जाणे* ★ अर्थ ::~
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *चक्रवत् परिवर्तन्ते दु:खानि च सुखानि च ।*
⭐अर्थ ::~ सुखदु:खे चाकाप्रमाणे पालटत असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
*🛡 ★ 15. जुलै ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १९६ वा (लीप वर्षातील १९७ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९७ : पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड
●१९९६ : स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
●१९५५ : पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
●१९५५ : आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२७ : प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
◆१९०५ : चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान
◆१९०४ : गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
◆१९०३ : के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री
◆१६११ : मिर्झा राजे जयसिंग
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार,
●१९९९ : इंदुताई टिळक – सामाजिक कार्यकर्त्या
●१९९८ : ताराचंद परमार – गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक
●१९९१ : जगन्नाथराव जोशी – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते
●१९६७ : नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ – गायक व नट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *✸ आता उठवू सारे रान ✸*
●●●●●००००००●●●●●
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान
कोण आम्हां अडवील, कोण आम्हां रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण
शेतकर्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *❂ हनुमान वंदना ❂*
━═●✶✹★●★✹✶●═━
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम्।
दनुजवनकृषानुम् ज्ञानिनांग्रगणयम्।
सकलगुणनिधानं वानराणामधीशम्।
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥
मनोजवं मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15. *❝ असंगाचा संग ❞*
━━═•●◆●★●◆●•═━━
एका गृहस्थाकडे एक बैल होता. तो संध्याकाळी इतर गुरांबरोबर नेहमी वेळेवर घरी जायचा.
परंतु एके दिवशी तो घरी न येता दुस-या बैलांबरोबर एका शेजा-याच्या वाडयात निघून गेला. वाडयात शिरल्यावर पोटभर खाऊन मनमुराद नासधूस करून इतर बैल विश्रांती घेत होते व तेथेच थोडा वेळ शांत बसले .
इतक्यात वाडयाचा मालक काठी हातात घेऊन धावत आला.
*तेथील बैलांना नेहमीचीच सवय असल्याकारणाने मालकाला चुकवून ते मार न खाता एकदम पसार झाले .*
परंतु त्या गरीब बैलाला असली मुळीच सवय नसल्यामुळे कोणत्या बाजूने पळून जावे हे त्याला सुचेना , आणि अखेरीस बराच चोप दिल्यावर मालकाने त्याला जाऊ दिले.
मध्यरात्री घरी आल्यावर त्याचा मालक त्याला पाहण्यास आला बैलाच्या पाठीवर वळ त्याच्या दृष्टीस पडले.
मालकाने त्या माराचे कारण मनात समजून एक भले मोठे लोढणे त्याच्या गळ्यात अडकवून दिले. जेणेकरून त्याला पळता येईना. अर्थातच त्यानंतर तो कधी दुसर्याच्या वाडयात शिरलाही नाही..
सद्गुणी असतानाही एका प्रसंगाने त्याच्या गळ्यात कायमचे लोढणे अडकले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
असंगाचा संग करण्याच्या दोषाने चांगल्या बुद्धीला भ्रम झाला
*कुसंगती थोडा वेळ जरी प्राप्त झाली तरी ती अब्रुला हानीकारक होते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *जो सूर्य* मला *उन्हाळ्यात*
नकोस वाटतो..
तोच *सूर्य* मला *हिवाळ्यामध्ये*
किती *हवा हवासा वाटतो*,
तसेच *माणूस* देखील
*सुखामध्ये* जवळच्या *नात्यांना*
विसरतो पण *दुःखाच्या क्षणी*
तीच *नाती हवी हवीशी वाटतात...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
15. *✿महत्वाचे पदावरील व्यक्ती✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
● भारतीय प्रतिभूति एवं विनियामक बोर्ड (SEBI) ::~ अध्यक्ष,
::~ यू.के. सिन्हा
● राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक (NABARD) - अध्यक्ष,
::~ डॉ हर्ष कुमार भानवाला
● (SBI) - अध्यक्ष,
::~ अरुन्धति भट्टाचार्य
● भारतीय औद्योगिक विकास बैंक (IDBI) - अध्यक्ष, ::~ किशोर खरात
● (Company Law Board) - अध्यक्ष, ::~ श्री महेश मित्तलकुमार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
15. *❒ डॉ. विजय भाटकर ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
विजय पांडुरंग भटकर यांचा
जन्म ११ ऑक्टोबर १९४६ झाला.
हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा या गावाचे. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे आणि पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी फिरून पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांना परदेशी नोकऱ्यांची अनेक आमंत्रणे होती, पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले होते. विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना १९६८ साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार’ साठी १९७२ साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी (त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठया प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे १९८० ते१९८७ या काळात ते संचालक होते.) भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. १९९२ च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधीनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने भटकरांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या. सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत १९८७ मध्ये उपाध्यक्ष झाले.
भारताने अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपला स्वत:चा महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात २ जून १९८८ रोजी केली. भटकर हे तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट सेंटर’चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला काम करीत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. असे असून, डॉ.विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दिला. भटकरांनी १९९३ मध्ये परम-८०० तर १९९८मध्ये परम-१००० हे संगणक बनवले. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे.
त्यांनी पुण्यातील सी-डॅकमध्ये प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी ‘एज्युकेशन टू होम’ (इटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली.
भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या. विज्ञान व तंत्रज्ञानात रमणारा हा शास्त्रज्ञ भारतीय संस्कृती, वेद-उपनिषदे, संत साहित्य व अध्यात्म विचार यांच्यातही रस घेणारा आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी यातायात कमी व्हावी, या विचाराने त्यांनी सी-डॅक मधून मुक्त होऊन ‘एज्युकेशन टु होम’ (ETH) या प्रकल्पाला वाहून घेतले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जबाबदार्या सांभाळताना त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. केंद्र शासनाने त्यांना पद्मश्रीने गौरविले, तर महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित बहुमान केला. ७० हून अधिक शोधनिबंध व आठ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. युरोपिअन संस्कृतीचा अभ्यास करणारे, तसेच आध्यात्मिक अनुभूतीसाठी ध्यानधारणा करणारे व आजही सक्षमतेने कार्यरत असलेले डॉ. विजय भाटकर भारतीय युवकांचे आदर्श ठरलेले आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ रविवार ~ 15/07/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment