"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*16/07/18 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 16/07/2018 ❂*
       *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *16. जुलै :: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             आषाढ शु. ४
      तिथी : शुक्ल पक्ष चतुर्थी,
            नक्षत्र : मघा,
 योग : व्यतिपात,  करण : वणीज,
सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाजोपयोगी विकास.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16. *कामपुरता मामा ताकापुरती मामी *     *★ अर्थ ::~*
   - गरजेपुरता गोड बोलणारा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *सहसा विदधीत न क्रियाम् अविवेकः परमापदां पदम्*
           ⭐अर्थ ::~
    कोणतीही गोष्ट सारासार विचार न करता एकाएकी करू नये. अविवेक हा मोठ्या संकटांना कारणीभूत होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 *★16. जुलै★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १९७ वा (लीप वर्षातील १९८ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९२ : भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
●१९६९ : चंद्रावर पहिला मानव उतरवणार्‍या ’अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण
●१९४५ : अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी
 ● ६२२ : प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची या दिवसापासुन सुरूवात झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८४ : कतरिना कैफ – चित्रपट कलाकार
◆१९६८ : धनराज पिल्ले – हॉकी पटू
◆१९२३ : के. व्ही. कृष्णराव – भूदल प्रमुख, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल
◆१९१७ : जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक
◆१९१४ : वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक
◆१९१३ : स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य
◆१९०९ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९३ : उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू
●१९८६ : वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *❂ स्वातंत्र्याची घुमे तुतारी ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
स्वातंत्र्याची घुमे तुतारी दुमदुमली धरती
हे शिवशंकर मुक्ती दायिनी जय जय जनशक्ती

कणकणातून जागृत झाला मंत्र तुझा बलशाली
सळसळणार्‍या रक्तामधुनी फुलल्या लाख मशाली
दिशादिशातून तुझ्या यशाच्या लखलखती ज्योती

मुठी-मुठीतून तूच घडविली परक्रमाची गाथा
एकजुटीने भंगलास तू अन्यायाचा ताठा
मांडिलेस तू अपूर्व तांडव इथल्या जनतेसाठी

तव तेजाने उजळून उठली इतिहासाची पाने
कालचक्र हे अखंड गाईल तुझ्या किर्तीचे गाणे
पिढ्या-पिढ्यांना स्फूर्ती देईल धगधगती क्रांती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. *❂ सुंदर ते ध्यान ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेऊनिया

तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16.  *❃❝ स्वप्न आणि सत्य ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      एकदा स्‍वप्‍न आणि सत्‍य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता ’भविष्‍य घडविण्‍यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्‍या पित्‍ याकडे गेले. पित्‍याला वादाचा विषय सांगितला. पिता म्‍हणाला,’’ज्‍या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्‍याचा भविष्‍य घडविण्‍यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्‍वप्नाने एकाच उडीत त्‍याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्‍हाच उचलले गेले होते. मग सत्‍याने प्रयत्‍न केला मात्र त्‍याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्‍न केले पण दोघेही अयशस्‍वी राहिले. शेवटी थकून ते पुन्‍हा एकदा पित्‍याकडे गेले तेव्‍हा पिता म्‍हणाला,’’ भविष्‍य घडविण्‍यात सत्‍य आणि स्‍वप्‍न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’

     *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खाद्यावर उभे राहायला हवे*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16. जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन
   पाहू नका, कारण...
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

16.  *✿ देश व टोपननावे  ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■  कांगारूंचा देश.
    ➜ ऑस्ट्रेलिया

■ उगवत्या सूर्याचा देश.
   ➜  जपान

■  मध्यरात्रीच्या सूर्याचा देश.
    ➜  नॉर्वे

■  सूर्यास्ताचा देश.
    ➜  ब्रिटन
 
■  उंच इमारतीचे शहर.
    ➜ न्यूयार्क
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

16.  *❒ अरुणा असफ अली ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १६ जुलै १९०९
●मृत्यू :~  २९ जुलै १९९६

    स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

    अरुणा असफ अली यांचा जन्म 16 जुलै 1909 रोजी कोलका (हरियाणा) येथील एक पुराणमतवादी हिंदू बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अरुणा गांगुली होते लाहोर आणि नैनीतालच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले. पदवीधर झाल्यानंतर, अरुणाने असफ अली गोखले मेमोरियल स्कूल, कलकत्ता येथे शिक्षक म्हणून काम करणे सुरु केले. अलाहाबादमध्ये, त्यांनी आपल्या पती असफ अलीला भेटले, ते एक प्रमुख काँग्रेस नेते होते आणि त्यांच्यापेक्षा 23 वर्षांनी मोठे होते. 1928 मध्ये त्यांनी आपल्या पालकांच्या इच्छेविरूद्ध विवाह केला होता.

    स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात अरुणा असफ अली नायिका म्हणून उदयास आले. 1942 मधील भारत छोडो आंदोलन या काळात त्याने त्याचे मूल्य सिद्ध केले. त्यांनी गोवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय झेंडा फडकवून भारत छोडो आंदोलन सुरू करण्यास सांगितले. असे केल्याने, हजारो  युवकांना प्रेरणा देऊन अनुकरण करायला होते आणि देशाच्या स्वातंत्र्यसाठी काहीतरी करायचे होते.

     असफ अली पूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होते, म्हणून विवाह झाल्यानंतर अरुणा असफ अली यांनीही या मोहिमेत त्यांची साथ केली. 1930 साली मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान त्यांनी सार्वजनिक सभांना संबोधित केले आणि मिरवणूकी काढली. ब्रिटिश सरकारने एका अनोळखी व्यक्ति असल्याचा आरोप केला आणि त्याला एक वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली. गांधी-इरविन यांच्या अधिवेशनात सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली, परंतु अरुणा सोडण्यात आला नाही. परंतु जेव्हा त्याच्या नावावर एक जनसंपर्क होता, तेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांना सोडून जावे लागले.

    1932 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि तिहार कारागारात ठेवण्यात आले. तिहार तुरुंगामध्ये राजकीय कैद्यांच्या वाईट आचरणाच्या विरोधात ते उपोषण सोडले. त्यांच्या विरोधामुळे, गोष्टी सुधारली आहेत. पण तो स्वत: अंबाला च्या एकटा कारावासात गेला. मुक्त झाल्यानंतर ते 10 वर्षे राष्ट्रीय चळवळीपासून विभक्त झाले. 1942 मध्ये ती तिचे पती ऐतिहासिक 8 ऑगस्ट रोजी मुंबई काँग्रेसचे अधिवेशन भाग घेतला पास 'भारत छोडो' ठराव. काँग्रेस आणि अरुणा अटक नेते Gulia टाकी रिंगण मुंबई मध्ये hoisting चळवळ अध्यक्षतेखाली नंतर ठराव नंतर एक दिवस गेला. त्यांनी आंदोलनात एक नवीन आवेश भरावा भारत छोडो आंदोलनात ते पूर्णत: सक्रिय झाले आणि अटकपूर्व बचावण्यासाठी भूमिगत बनले. त्यांची संपत्ती सरकारच्या जप्तीद्वारे विकली गेली. सरकारनं त्यांना पकडण्यासाठी 5 हजार रुपये जाहीर केले. दरम्यान, तो आजारी पडला व गांधीजींच्या शपथेसंदर्भातील सल्ला ऐकत होता. 26 जानेवारी 1946 रोजी अरुणा असफ यांनी स्वत: ची शरणागती पत्करली.

     स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अरुणा असफ अली सोशलिस्ट पार्टीचा सदस्य होता. तेव्हापर्यंत समाजवादी पक्ष कॉंग्रेसच्या चौकटीचा भाग होता. तथापि, 1948 मध्ये अरुणा व सोशलिस्ट गटांनी एकत्रितपणे समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1955 मध्ये हे गट भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये सामील झाले व अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे उपाध्यक्ष व केंद्रीय समितीचे सदस्य झाले. 1958 मध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निवड केली आणि दिल्लीचे पहिले महापौर निवडून आले. 1964 साली ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये सामील झाले पण सक्रियपणे भाग घेण्यास नकार दिला. 1975 मध्ये त्याला लेनिन पीस प्राइज आणि 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय ज्ञानासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अरुणा असफ यांची 29 जुलै 1996 रोजी निधन झाले. 1998 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारत रत्न' आणि 'इंडियन पोस्टल सर्व्हिस' यांनी त्यांना टपाल तिकिट काढुन त्यांना सन्मान दिला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ सोमवार ~ 16/07/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment