"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

25/06/18 सोमवारचा परीपाठ

   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 25/06/2018 ❂*
       *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *25. जून :: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
            निज जेष्ठ शु. १३
       तिथी : शुक्ल पक्ष त्रयोदशी,
             नक्षत्र : अनुराधा,
     योग : साध्य, करण : कौलव,
सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25. *दुरून डोंगर साजरे*
      *★ अर्थ ::~*
    लांबून दोष दिसत नाहीत
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *यतो धर्मस्ततो जयः ।*
          ⭐अर्थ ::~
 जिथे धर्म तिथेच विजय असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★25. जून★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १७६ वा (लीप वर्षातील १७७ वा) दिवस आहे.
★मोझांबिकचा स्वातंत्र्य दिन

                 ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८३ : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.
●१९७५ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.
●१९३४ : महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.
●१९१८ : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

               ~*★जन्मदिवस / जयंती★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८६ : सई ताम्हनकर – अभिनेत्री
◆१९७४ : करिश्मा कपूर – अभिनेत्री
◆१९३१ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे
◆१९२४ : मदनमोहन – संगीतकार
◆१९०० : लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल

                 ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
             🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता
●२००० : रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या
●१९७९ : अण्णासाहेब – मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष
●१९२२ : सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25.  *✸ महाराष्ट्र देशा ✸*
     ●●●●●००००००●●●●●
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा ------ प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ------ नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा ------- बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा----- शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;-------जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी -------जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा------ सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा----- गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ------- मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
               कवी - गोविंदाग्रज
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *❂ नमने वाहुनि स्तवने ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.

विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.

आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.

विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25.  *❃❝ म्हातारा आणि मृत्यु ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      एक अतिशय म्हातारा माणूस* लाकडे आणण्यासाठी रानात गेला. तेथे काही लाकडे जमा करून त्याची एक मोळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत घराकडे चालला.
      वाटेत डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाली टाकून धापा टाकत खाली बसला. त्यावेळी तो मृत्युला म्हणाला, 'हे प्राणीमात्राच्या विसाव्या, तू ये आणि या दुःखातून मला सोडव.'
      ते ऐकताच प्रत्यक्ष मृत्यू म्हातार्‍याच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याला म्हणाला, 'बाबा, तू माझी आठवण का केली होती?' मृत्यू इतका जवळ आहे हे त्या बिचार्‍या म्हातार्‍याला माहीत नव्हते.
       मृत्यूची ती भितीदायक मूर्ति पाहून म्हातार्‍याची भितीने गाळण उडाली. मग थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणाला, 'मृत्यू देवा, मी अशक्त, माझ्या डोक्यावरची मोळी अचानक खाली पडली. ती उचलून देशील म्हणून मी हाक मारली. दुसरं काही कारण नाही. खरंचच इतकं काम होतं आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल, तर मी तुझ्या पाया पडतो. मला क्षमा कर व आलास तसाच कृपा करून माघारी जा.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   मृत्यूविषयी थट्टेने बोलण्याची काही लोकांना सवय असते. थोडेसे संकट आले की मरण येईल तर बरे असे म्हणतात पण मृत्यू दूर आहे तोवरच ह्या गोष्टी.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *शाळेच्या कवायतीमध्ये 'पीछे मुड' बोलताक्षणी, पहिला माणुस शेवटी आणि*
*शेवटचा माणुस पहिल्या क्रमांकावर येतो...*
 *आयुष्यातंही पुढे असण्याचा गर्व आणि* *शेवटी असण्याचे कधीच दुःख मानु नका...*
*माहिती नाही हे आयुष्यं,* 
*कधी म्हणेल, 'पीछे मुड'...!!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

25. *✿ वर्षे व ऐतिहासिक घटना ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ १९३१ : भगतसिंग , सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
■ १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
■ १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
■ १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
■ १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
■ १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

25. *❒ विश्वनाथ प्रताप सिंह ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २५ जून १९३१
● मृत्यू :~ २७ नोव्हेंबर २००८

      हे भारताचे दहावे पंतप्रधान

(कार्यकाळ:~ २ डिसेंबर  १९८९ ते१० नोव्हेंबर १९९०)

                      ★विश्वनाथ प्रताप सिंग ★
           भारतीय राज्य घटनेने 340 व्या कलमानुसार ओबीसींना शिक्षणात व नोकरी मध्ये लोकसंखेच्या प्रमाणात आरक्षण दिले आहे. पण तत्कालीन पंतप्रधान श्री. पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार पटेल यांनी ओबीसींच्या आरक्षणाला विरोध केला होता. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला आरक्षणाची गरज आहे हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले. जर ओबीसींना आरक्षण दिले तर बाबासाहेब आंबेडकर हे ओबीसींचे तारणहार म्हणून उदयास येतील व आपल्या पाठीशी असलेला ओबीसी बाबासाहेबांचा अनुयायी बनेल या भीतीपोटी सरदार पटेल व नेहरूंनी ओबीसींना घटनेने जे आरक्षण दिले होते त्यांच्याशी धोकाधडी केली, कालेकर नंतर मंडल आयोग स्थापन करून ओबीसींचे आरक्षण लांबविले याचा परिणाम असा झाला की ओबीसींच्या दोन पिढ्या अक्षरशः आरक्षण नसल्यामुळे व महागडय़ा शिक्षणामुळे बरबाद झाल्या.
      ओबीसींच्या आरक्षणाला पहिलेंदा जर कुणी वाचा फोडली असेल ती म्हणजे मान्यवर श्री. कांशीराम साहेबांनी एक दलित समाजाच्या व्यक्ती नेच ओबीसींना सुद्धा घटनेत आरक्षण आहे. हे जगाला ओरडून सांगितले ठिकठिकाणी सभा व बामसेफ च्या माध्यमातून ओबीसींमध्ये जनजागृती केली.(माझ्यासकट कीतीतरी म्हणजे 90% लोक हे आताही बाबासाहेबांनी फक्त एस्सी एसटी समाजासाठीच आरक्षण दिले असा समज करून घेतला आहे).
त्यांनी सर्व ओबीसी नेत्यांना म्हणजे व्ही.पी.सिंग, लालूप्रसाद यादव, शरद यादव मुलायमसिंग यादव, देविलाल ई. लोकांना सांगितले की घटनेत ओबीसींसाठी आरक्षण आहे. तेव्हा सर्व ओबीसी नेते (जनता दल) एक झाले व त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात ओबीसींसाठी असलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले.
  राजीव गांधींचा पाडाव करून पहिलेंदा देशात जनता दलाचे सरकार बीजेपीच्या पाठींब्यावर स्थापन झाले.
व्ही.पी.सिंग सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आदेश दिले. तेव्हा बीजेपी शिवसेनेच्या लोकांनी त्याला कडाडून विरोध केला. ओबीसींच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. हे आरक्षण एस्सी एसटी समाजासाठीच फायद्याचे आहे अशी अफवा पसरली व माझा ओबीसी बांधवच आरक्षणाचा विरोध करू लागला. ठिकठीकाणी जाळपोळ व तोडफोड करण्यात आली.
दिल्ली विद्यापीठात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हा मुद्दा संसदेत चांगलाच गाजला. त्यावर भाष्य करताना सुषमा स्वराज यांनी म्हटले होते की जर ओबीसींना शिक्षणात व नोकरी मध्ये आरक्षण दिले तर ओपनच्या जागा कमी होतील. कमी गुणवत्तेचा मुलगा समोर गेला तर ओपनच्या मुलांच्या मानसिकतेवर परीणाम होईल आरक्षण विरोधी या लढाईत मी ओपनच्या मुलांसोबत आहे असे जाहीर करून टाकले. देश अक्षरशः पेटला होता. ज्या ओबीसींच्या जिवावर हे लोकं निवडणून येतात त्याच ओबीसींना आरक्षण द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा सर्वांनी मिळून त्याचा विरोध केला. पण व्ही.पी.सिंग या खंद्या नेत्यांने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. जश्या शिफारशी लागू केल्या बीजेपी ने आपला पाठिंबा काढून टाकला. ओबीसीच्या आरक्षणाला बीजेपीने विरोध केला असा लोकांचा समज झाला त्यातून बाहेर येण्यासाठी बीजेपी ने बाबरी मशिदचा मुद्दा उकरून, अडवाणीने देशभर रथयात्रा काढली.
    मिञांनो व्ही.पी.सिंग साहेबांनी आपल्या खुर्चीची तमा न करता मंडल आयोग लागू केला त्यामुळेच सामान्य शेतकऱ्याचा मुलगा डॉ. शिक्षक होऊ शकला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ सोमवार ~ 25/06/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment