"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

27/06/18 बुधवारचा परीपाठ

   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 27/06/2018 ❂*
       *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *27. जून :: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
            निज जेष्ठ शु. १४
       तिथी : शुक्ल पक्ष चतुर्दशी,
               नक्षत्र : ज्येष्ठा,
    योग : शुक्ल, करण : वणीज,
सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27. *हातच्या कंकणाला आरसा कशाला?*- 
*★ अर्थ ::~* जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *गुणै: गौरवमायाति ।*
           ⭐अर्थ ::~
 गुणांनी (मनुष्याला) गौरव प्राप्त होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

           🛡 *27. जून* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हेलन केलर दिन
★हा या वर्षातील १७८ वा (लीप वर्षातील १७९ वा) दिवस आहे.

                  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
             🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९६ : अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर
●१९९१ : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
●१९५४ : अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

                ~*★जन्मदिवस / जयंती★*~
             🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३९ : राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार
◆१८८० : हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)
◆१८७५ : दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त'
◆१८६४ : शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
◆१८३८ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)

                 ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : फील्ड मार्शल सॅम माणेकशा
●२००० : द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार
●१९९८ : होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार
●१८३९ : महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक
●१७०८ : धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *✸ अजिंक्य भारत ✸*
    ●●●●●००००००●●●●●
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे

मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे

भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे

इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *❂ तिमिरातुनी तेजाकडे ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयानिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27.  *❃ 'संस्कार ❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
    गावातल्या आडावर 3 बायका पाणी भरत होत्या..
त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता. तर त्याला पाहुन ती म्हणाली,
"तो बघा माझा मुलगा,
इंग्लिश मेडियामला आहे."

        पुन्हा त्यानंतर दुसरीचा
मुलगा तिथुन निघाला होता..
तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली,
       "तो बघा माझा मुलगा,
सीबीएसई ला आहे."

तेवढ्यात तिसरीचा मुलगा
तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला... पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला,
 "आई चल घरी."
त्याची आई म्हणाली,
   *"मराठी शाळेत शिकत आहे ."*
आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी दोघींच्या नजरा खाली गेल्या.

        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
     लाखो रुपये खर्चून देखील 'संस्कार' विकत घेता येत नाही..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27 *माणसाने सुखाने आयुष्य जगावं*

   काल आपल्याबरोबर काय घडलं 
         याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
            याचा विचार करा.

  कारण आपण  फक्त गेलेले दिवस
         मोजण्यासाठी नाही तर...
उरलेले दिवस आनंदाने घालवायला
         जन्माला आलोय..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *✿ महाराष्ट्राची माहिती ✿*
      ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
◆ महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ
       ::~  3,07,713 चौ. कि.मी.

◆ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक -
     ::~   तिसरा (राजस्थान व
      मध्यप्रदेश राज्यानंतर तिसरा)

◆ महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी
     ::~ 720 कि.मी.
(काही ठिकाणी ही 700 कि.मी. आहे)

◆ महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला एकूण  ::~  9.36% प्रदेश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27. *❒ छत्रपती शाहू महाराज ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●पूर्ण नाव :~ यशवंत आप्पासाहेब घाटगे
●जन्म :~ २६ जून इ.स.१८७४, कागल, कोल्हापूर
●राज्याभिषेक :~ २ एप्रिल १८९४,
●मृत्यू :~ ६ में १९२२ मुंबई
●राज्यव्याप्ती :~ कोल्हापूर जिल्हा

                         *◆ राजर्षी शाहू महाराज ◆*
    चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे इ.स. १८८४- १९२२ सालांदरम्यान छत्रपती होते.

                          ◆ जन्मदिवस
    शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस *‘सामाजिक न्याय दिवस’* म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात.

                       ◆ प्रेरणादाई कार्य
    शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.

    ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.

    त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

    स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात "महाराजांचे महाराज‘ असा गौरव होतो. शाहू महाराजांना "राजर्षी" ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार ~ 27/06/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment