*❒ उस्ताद अल्लारखा खान ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ २९ एप्रिल १९१९ फगवाल जम्मू येथे●मृत्यू :~ ३ फेब्रुवारी २०००
★ उस्ताद अल्लारखा खान ★
यांना तबल्याचा जादूगार अस म्हटल जाते. वयाच्या १२ व्या वर्षापासून अल्ला रक्खा खान यांच तबल्याशी नात दृढ झाल होते. उस्ताद अल्लारखा खान यांनी आपली कारकीर्द १९४० साली मुंबई आकाशवाणी चे स्टाफ़ आर्टिस्ट म्हणून केली.तेव्हा लोकांना तबला हे फक्त संगीतातील वाद्य आहे अशी धारणा होती. ही धारणा अल्ला रक्खा खान यांनी बदलली. १९४५ ते १९४८ हिंदी चित्रपटाला संगीत दिले पण ते बॉलीवूड मध्ये यशस्वी झाले नाहीत. उस्ताद अल्लारखा खान यांनी बड़े ग़ुलाम अली ख़ाँ, उस्ताद अलाउद्दीन ख़ाँ, पंडित वसंत राय व पंडित रविशंकर यांना खूप वेळा तबल्याची साथ केली. उस्ताद अल्लारखा खान यांनी भारत व विदेशात तबल्याला एक स्वतंत्र वाद्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. भारत सरकारने १९७७ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.१९८२ साली संगीत नाटक अकादमी अवार्ड त्यांना मिळाले होते. त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी म्हणत. उजवा तसेच डावा असे दोन्ही हातांचा उत्तम समन्वय साधत तबलावादन करणे ही अल्ला रक्खा खान यांची विशेषता होती. अल्ला रक्खा खान यांना तीन मुले, झाकीर हुसेन, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी.
झाकीर हुसेन आणि र्फ्क्युनिस्ट तौफिक कुरेशी लोकांना माहिती आहेत. पण तबलावादक फझल कुरेशी नेहमीच लो-प्रोफाइल राहिले आहेत. मुंबईत क्लासिकल संगीताची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहे. जेव्हा जेव्हा पंजाब घराण्याची चर्चा होते तेव्हा उस्ताद अल्लारखा खान यांच्या नावाची चर्चा होते. त्यांच्या निधनानंतर तबल्याच एक युग संपले अस म्हणतात. उस्ताद अल्लारखा खान यांचे ३ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले.
No comments:
Post a Comment