"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

अनमोल सुविचार 10

 
    ■★ अनमोल सुविचार ★■   
  ╰════════════╯
२२६) टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

२२७) प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.

२२८) मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

२२९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.

२३०) वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

२३१) त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

२३२) शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.

२३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

२३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.

१३५) दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

२३६) ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.

२३७) दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

२३८) जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

२३९) एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

२४०) सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

२४१) श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

२४२) राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

२४३) संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

२४४) असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.

२४५) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

२४६) ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

२४७) जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.

२४८) पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

२४९) मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

२५०) दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 आणखी अनमोल सुविचार वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 01
 02
 03
 04

 08 09 10 11 12 13 ⏩⏩

No comments:

Post a Comment