"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

4/12/24 बुधवारचा परिपाठ

Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *04. डिसेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.३, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~तृतीया,नक्षत्र ~पूर्वाषाढा,
योग ~गण्ड, करण ~गर,
सूर्योदय-06:57, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

04. *जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

04. *ऊस गोड लागला म्हणून मुळासकटखाऊ नये*    
       *★ अर्थ ::~*
- मदत करणाऱ्याचा अति फायदा घेतल्यास आपला तोटा होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

04. *ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः ।* 
      ⭐अर्थ ::~ एकी (संघटितपणा) हे समाजाचे बळ असून ऐक्याच्या अभावी समाज दुर्बळ ठरतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

    🛡 ★ 04. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ भारतीय नौदल दिन
★ हा या वर्षातील ३३८ वा (लीप वर्षातील ३३९ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९७ : संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
●१९४८ : भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
●१९६७ : थुंबा येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण
●१९२४ : मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्‍घाटन झाले.

   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३५ : शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याL परंपरेतील गायक
◆१९१९ : इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान
(मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१२)
◆१९१० : आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी
◆१९१० : मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७४ : शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’
(जन्म: २८ आक्टोबर १८९३)
●११३१ : ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (जन्म: १८ मे १०४८)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

04. *✸ ऐ मेरे वतन के लोगों ✸*
    ●●●●००००००●●●●
ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो
कुछ याद उन्हें भी कर लो..
जो लौट के घर न आये
जो लौट के घर न आये..

ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

जब घायल हुआ हिमालय
खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा
सो गये अमर बलिदानी
जो शहीद...

जब देश में थी दीवाली
वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में
वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो आपने
थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद...

कोई सिख कोई जाट मराठा
कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला
हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पवर्अत पर
वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद...

थी खून से लथ-पथ काया
फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गये होश गँवा के
जब अन्त-समय आया तो
कह गये के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों
अब हम तो सफ़र करते हैं
क्या लोग थे वो दीवाने
क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद...

तुम भूल न जाओ उनको
इस लिये कही ये कहानी
जो शहीद...

जय हिन्द... जय हिन्द की सेना..
जय हिन्द... जय हिन्द की सेना..
जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

04. *❂ मंगल देशासाठी ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥

अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान॥१॥

ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान॥२॥

ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण॥३॥

स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान्॥४॥

आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

04. *❃ खरे काय नि खोटे काय ❃*
   ल━═•●◆●★●◆●•═━
       एका गावाच्‍या बाहेरच्‍या बाजूला एक झोपडी होती. त्‍यामध्‍ये एक गरीब कुटूंब राहत होते. कामानिमित्ताने घरातील यजमान बाहेरगावी गेले होते. झोपडीत फक्त आई आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा राहिले होते. आईकडे तो मुलगा काही तरी मागत होता व आईजवळ ती वस्‍तू आणण्‍यासाठी पैसे नसल्‍याने ती त्‍याला गप्प बसविण्‍याचा प्रयत्‍न होती पण मुलगा काही गप्‍प होईना. त्‍याने त्‍या वस्‍तूचा आपला हट्ट पूर्ण होत नसल्‍याचे पाहून मोठ्याने रडायला सुरुवात केली. आई त्‍याला गप्प करण्‍याचा प्रयत्‍न करू लागली पण मुलगा काही शांत होईना. त्‍याच वेळेस भूकेने व्‍याकूळ झालेला एक लांडगा त्‍या झोपडीपाशी आला व भक्ष्‍याचा शोध घेऊ लागला. आईला व मुलाला झोपडीबाहेर काय आले आहे याची किंचितशीसुद्धा कल्‍पना आली नाही. आई आपल्‍या रडणा-या मुलाचे रडणे थांबविण्‍यासाठी म्‍हणाली,'' अरे तुला कितीवेळा समजावून सांगितले तरी तू गप्‍प काही बसत नाहीयेस. आता जर तु गप्प बसला नाहीस आणि रडणे थांबविले नाही तर मी तुला लांडग्‍याला देऊन टाकीन. मग तो लांडगा तुला खाऊन टाकेल.'' आपल्‍या नावाचा उच्‍चार झालेला पाहून लांडग्‍याला खूप आनंद झाला व आपल्‍याला आता भूकेच्‍या वेळेस कोवळे लुशलुशीत माणसाचे मांस खायला मिळणार म्‍हणून लांडगा मनामध्‍ये खूप खूश झाला. त्‍याने तिथेच आपली बैठक मांडली व माणूस कधी बाहेर फेकला जातो याची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्‍याच्‍या कानावर त्‍या मुलाच्‍या आईचे शब्‍द आले की,'' अरे माझ्या बाळा, मी कशी बरे तुला लांडग्‍याकडे देईन, मी तुझी आई आहे रे. तो मेला, दुष्‍ट, धूर्त लांडगा मरू दे तिकडेच आणि चुकून जरी तो इकडे आला ना तर मी त्‍याला जळत्‍या लाकडाने बडवीन आणि बाळा तुझे रक्षण करीन.'' आईचे हे बोलणे ऐकून निराश झालेला तो लांडगा तिथून निघून जाताना मनाशीच बडबडला,'' माणसांचे जगच खरे निराळे आहे,

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  ओठात एक आणि पोटात एक वागणाऱ्या माणसांपासून कायम  सावध  राहिलेलेच बरी. ते म्हणतात न गळ्यात माळ आणि पोटात गाळ तसे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

04.   लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो...

    तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

04. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  महात्मा फुले यांचा जीवनध्यास कोणता होता ?
  ➜ मानवतावाद.

✪ थाॅमस पेनचे कोणते पुस्तक ज्योतिबा फुले आवडीने वाचत ?
  ➜ राईट्स ऑफ मॅन.

  ✪ मुंबईत पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली ?
  ➜ नाना शंकरसेठ.

✪  शतपत्रे कोणी लिहिली ?
  ➜ गो. ह. देशमुख.

  ✪ डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना कोणी केली ?
  ➜ महर्षी वि. रा. शिंदे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

04. *❒ ♦आर. वेंकटरमण♦ ❒* 
     ━━•●◆●★●◆●•═━
भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री,
     कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी
_यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

*●जन्म :~ 4 डिसेंबर, 1910*
●मृत्यू :~ 27 जानेवारी, 2009

     आर वेंकटरामन भारतीय गणराज्यचे आठवे राष्ट्रपती आहेत. पूर्वी ते उपराष्ट्रपती देखील होते. त्यांची कार्ये व जबाबदा-या वेंकटरमन हे केवळ एक कार्यक्षम आणि प्रौढ राजकारणी, पण खूप परिपक्व आणि चांगला मनुष्य अत्यंत संवेदनशील राहा. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना तांबेपट्टी देण्यात आली. भारत माता देशाच्या अशा सृजनात्मक संतला विसरू शकत नाही.

   आर वेंकटरमन हे 4 डिसेंबर, 1910 रोजी तामिळनाडूतील तंजावर जवळ Pattukotty मध्ये जन्म झाला. वडिलांचे नाव रामस्वामी अय्यर होते आणि ते तंजौर जिल्ह्यात एक वकील होते. वेंकटरामनचे प्राथमिक शिक्षण मद्रास येथे झाले. परीक्षा पदवी कायदा परीक्षेकरिता मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्र उत्तीर्ण झाल्यावर, तो डी लॉ कॉलेज, मद्रास येथे प्रवेश घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे दोन पर्याय होते- एक ब्रिटिश सरकार काम करत असो किंवा स्वतंत्रपणे वकील असो त्याला ब्रिटिशांच्या अंतर्गत काम करण्याची परवानगी नव्हती म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे वकील करण्याचा निर्णय घेतला. 1935 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. 1951 पर्यंत ते कायद्याचे कायदा विद्वान म्हणून ओळखले जाऊ लागले. मग वकील म्हणून त्याचे काम सुरू केले.

   पुरस्कार दरम्यान वेंकटरमन 1942 चळवळ मध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी भारत छोडो गांधी सहभागी झाले होते. ब्रिटिश शासनाने त्यांना अटक केली आणि त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली. 1944 साली त्यांची मुक्तता झाल्यानंतर ते पुन्हा ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलनात सामील झाले. देशासाठी त्यांची आपुलसी प्रचंड होती. 1944 मध्ये त्यांनी तामिळनाडू काँग्रेस कमिटीवर कामगारांचा प्रभाव पाडला आणि प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. लवकरच नंतर, ते "व्यापार संघ नेते" म्हणून स्थापन करण्यात आले. कामगार आणि मजुरांसाठी ते नेहमीच काम करत होते. त्यांच्या समस्या सोडविणे हे वेंकटरमॅनचे प्राधान्य होते. ते परस्पर संवाद करून आणि समन्वयाद्वारे समस्यांवर मात करण्यासाठी वापरले. कायद्याचा अवलंब करणे आणि कामगारांच्या हितासाठी लढा देणे त्यांच्याकडे नव्हते. 1949 मध्ये त्यांनी 'कामगार कायदा' या नियतकालिकाची सुरुवात केली.

स्वातंत्र्यानंतर सराव मध्ये त्यांच्या श्रेष्ठत्व आणि ज्ञान दिले, भारतीय सरकार देशातील उत्कृष्ट वकील एक संघ अशी ठेवली. 1947 ते 1950 पर्यंत ते महाराष्ट्र बार असोसिएशनचे सचिव होते. राजकारणात येत असताना 1950 मध्ये ते स्वतंत्र भारताच्या अस्थायी संसदेचे सदस्य झाले. 1952 मध्ये देशातील पहिले संसदेचे गठन झाले तेव्हा त्यांनाही त्याचा एक सदस्य बनविण्यात आले. 1957 पर्यंत तो सदस्य राहिला. 1953 ते 1954 पर्यंत त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा पदभार स्वीकारला.

    1957 च्या लोकसभा निवडणुकीत वेंकटरामन यांची पुन्हा लोकसभेवर निवड झाली. या पदासाठी उत्कंठा दाखवून त्यांनी पद सोडले आणि मद्रास राज्य मंत्रिमंडळाची पद धारण केली. मग तेथे मुख्यमंत्री कामराज यांनी आपल्या राजकीय प्रतिभासमान शुद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1957 पासून 1967 पर्यंत, वेंकटरमन, मद्रास राज्य, व्यावसायिक सहकारी होते यशस्वीरित्या अशा कामगार, उद्योग, वाहतूक आणि ऊर्जा महत्त्वाची कामे हाताळली.

     1967 साली तामिळनाडूतील कॉंग्रेसच्या हातून सत्ता आली. त्यानंतर वेंकटरामन दिल्लीला आले. ते नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून निवडून आले. या काळात त्यांनी उद्योग, समाज, रहदारी, अर्थव्यवस्था संबंधित कामात काम चालू ठेवले. 1971 पर्यंत त्यांनी या पदांची प्रतिष्ठा वाढवली. 1980 मध्ये त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकली आणि संसद सदस्य बनले. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना अर्थमंत्र्याची निवड केली. 1982 ते 1984 पर्यंत संरक्षण मंत्री यांची जबाबदारी सोपवण्यात आली. 22 ऑगस्ट 1984 रोजी उपराष्ट्रपतींनी पदभार स्वीकारला. त्याच वेळी ते राज्यसभेचे अध्यक्षही होते. 24 जुलै 1987 रोजी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. 25 जुलै 1987 रोजी आठवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

     27 जानेवारी 2009 रोजी दीर्घ आजारांमुळे 98 व्या वर्षी दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁बुधवार ~ 04/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment