*22/01/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *22. जानेवारी:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष शु.12, पक्ष : शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~मृगशीर्ष,
योग ~ब्रह्म, करण ~बव,
सूर्योदय-07:14, सूर्यास्त-18:23,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
22. *शंका काढण्यास देखील ज्ञान लागते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
22. *घोडामैदानजवळ असणे –*
★ अर्थ ::~ परीक्षा लवकरच होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
22. *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
⭐अर्थ :: ~
क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●━━
🛡 *★22. जानेवारी ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील २२ वा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : ’आय. एन. एस. मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
●१९४७ : भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर
●१९२४ : रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३४ : विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
◆१९२० : प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक
◆१९१६ : सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक,
◆१९१६ : हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी
◆१९०९ : यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७२ : स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ
●१९६७ : डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार
●१९०१ : व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी, हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले. हिच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला
●१६८२ : *समर्थ रामदास स्वामी*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
22. *✸ शूर आम्ही सरदार ✸*
●●●●००००००●●●●
शूर आम्ही सरदार आम्हांला , काय कुणाची भीती
देव , देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती ll धृ ll
आईच्या गर्भात उमगली , झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत
लाख संकटे झेलुन घेईल , अशी पहाडी छाती ll १ ll
जिंकावं वा लढून मरावं , हेच आम्हांला ठाव
लढून मरावं मरून जगावं , हेच आम्हांला ठाव
देशापायी सारी विसरू , माया ममता नाती ll २ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
22. *❂ ⚜ऐ मालिक तेरे बंदे ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
ऐ मालिक तेरे बंदे , ऐसे हो हमारे करम
नेकी पर चले और बधी से टले
ताकी हँसते हुए निकले दम ll धृ ll
ये अँधेरा घना छा रहा , तेरा इंसान घबरा रहा हैं
हो रहा बेखबर कुछ न आता नजर
सुख का सुरज छिपा जा रहा
हैं तेरी रोशनी मैं वो दम
जो अमावस को कर दे पूनम ll १ ll
जब जुल्मों का हो सामना , तब तू ही हमें थामना
वो बुराई करे , हम भलाई करे
नही बदलेकी हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम
और मिटे गैर का ये भरम ll २ ll
बड़ा कमजोर हैं आदमी , अभी लाखों हैं इसमें कमी
पर तू जो खड़ा हैं दयालु बड़ा
तेरी कृपा से धरती थमी
दिया तूने हमें जब जनम
तू ही झेले हमारे ये गम ll ३ ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
22. *❝ प्रत्येक संधीचे सोने करा ❞*
━═•●◆●★●◆●•═━
एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,
भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा.
त्याला सोने आणि चांदी यात
जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि ; मोठ्याने हसू लागला ....
हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला ....
त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? " " सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ? म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!! मुलगा म्हणाला
राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...
रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे. मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातील
सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात....
राजा एका हातात सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..
आणि , मी चांदीचे नाणे उचलतो ..
त्यामुळे तिथे असलेले सगळे
मोठ्याने हसतात ... सार्यांना मजा वाटते......!! असे रोज घडते
मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो
चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही
न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"
मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला
कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या
नाण्यांनी भरलेली होती ...
हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..
मुलगा म्हणाला
" ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या ..
पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा..!!
काय वाटते ?
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
22. *शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे...*
*जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे...*
*भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे...*
*घासातील घास दुसऱ्याला देणे ही मराठी माणसाची संस्कृती आहे..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
22. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?
➜ त्र्यंबकेश्वर.
✪ भारतात आधुनिक सुधारणेला कुणाच्या काळात सुरूवात झाली ?
➜ लाॅर्ड डलहौसी.
✪ रसायनाचा राजा कोणाला म्हणतात ?
➜ सल्फ्यूरिक आम्ल.
✪ शून्यधारित अर्थसंकल्प मांडणारे
देशातील पहिले राज्य कोणते ?
➜ महाराष्ट्र.
✪ भारतात प्रवेश करणारा पहिला पोर्तुगीज कोण ?
➜ वास्को - द - गामा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
22. *❒ ♦पिंगली वेंकैया♦ ❒*
━═•●◆●★●◆●•═━
राष्ट्रीय ध्वज तिरंगा तयार करनारे ...
१९ व्या वर्षी ब्रिटीश आर्मीसोबत काम करणारे पिंगली वेंकैया ऊर्दू आणि जपानी भाषेसहीत अनेक दुस-या भाषांचे जाणकार होते.
१८९९ ते १९०२ पर्यंत आफ्रिकेत चाललेल्या Anglo- बोर युद्धा दरम्यान पिंगली वेंकैया यांची भेट महात्मा गांधीशी झाली. त्यानंतर ते स्वतंत्रता सेनानी , आणि ५० वर्षांपेक्षा अधिक काळ ते महात्मा गांधी यांच्यासोबत राहिले. १९१६ पासून ते १९२१ पर्यंत म्हणजेच पाच वर्षां दरम्यान पिंगली वेंकैया यांनी ३० देशांच्या राष्ट्रीय ध्वजांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी १९२१ मध्ये Indian National Congress च्या संमेलनात राष्ट्रीय ध्वजाचं आपलं डिझाईन सादर केलं. या डिझाईनमध्ये मुख्यत्वे लाल आणि हिरवा रंग होता.
ज्यात लाल रंग हिंदू आणि हिरवा रंग मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधीत्व करत होता. १९३१ मध्ये यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकारण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. आणि संशोधन करून लाल रंगाच्या जागी केसरी रंग घेण्यात आला. त्यावेळी राष्ट्रीय ध्वजाला स्वराज ध्वज असे संबोधले जात होते.
२२ जुलै १९४७, ला संविधान सभेत राष्ट्रीय ध्वजाच्या रुपात याचा स्विकार करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर हाच तिरंगा भारताच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रतिक झाला. नंतर रंग कायम ठेवत चरख्याच्या जागी अशोक चक्राला जागा देण्यात आली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁सोमवार ~22/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment