"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*27/06/19 गुरुवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*❁ दिनांक :~ 27/06/2019 ❁*
      *🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲◆🇸◆🇵●═━━

    🍥 *27. जून:: गुरुवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             जेष्ठ कृ. ९
     तिथी : कृष्ण पक्ष नवमी,
           नक्षत्र : रेवती
     योग : अतिगंड,  करण : गर,
सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂* 
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

27. *शञूची व रोगाची उपेक्षा करु नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27. *हातच्या कंकणाला आरसा कशाला?*-    
*★ अर्थ ::~* जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *गुणै: गौरवमायाति ।*
           ⭐अर्थ ::~
 गुणांनी (मनुष्याला) गौरव प्राप्त होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

           🛡 *27. जून* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हेलन केलर दिन
★हा या वर्षातील १७८ वा (लीप वर्षातील १७९ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९६ : अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर
●१९९१ : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
●१९५४ : अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र रशियात सुरू झाले.

     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३९ : राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार 
◆१८८० : हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका 
१८७५ : दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त'
◆१८६४ : शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार 
◆१८३८ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. 

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : फील्ड मार्शल सॅम माणेकशा 
●२००० : द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार 
●१९९८ : होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार 
●१८३९ : महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक 
●१७०८ : धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *✸ अजिंक्य भारत ✸*
    ●●●●●००००००●●●●●
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे

मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे

भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे

इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *❂ तिमिरातुनी तेजाकडे ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयानिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27.  *❃ 'संस्कार ❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
    गावातल्या आडावर 3 बायका पाणी भरत होत्या..
त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता. तर त्याला पाहुन ती म्हणाली, 
"तो बघा माझा मुलगा,
इंग्लिश मेडियामला आहे."

        पुन्हा त्यानंतर दुसरीचा
मुलगा तिथुन निघाला होता.. 
तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली,
       "तो बघा माझा मुलगा,
सीबीएसई ला आहे." 

तेवढ्यात तिसरीचा मुलगा
तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला... पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला,
 "आई चल घरी."
त्याची आई म्हणाली, 
   *"मराठी शाळेत शिकत आहे ."*
आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी दोघींच्या नजरा खाली गेल्या. 

        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
     लाखो रुपये खर्चून देखील 'संस्कार' विकत घेता येत नाही..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27 *माणसाने सुखाने आयुष्य जगावं*

   काल आपल्याबरोबर काय घडलं   
         याचा विचार करण्यापेक्षा 
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
            याचा विचार करा.

  कारण आपण  फक्त गेलेले दिवस
         मोजण्यासाठी नाही तर... 
उरलेले दिवस आनंदाने घालवायला
         जन्माला आलोय..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

27. *✿ महाराष्ट्राची माहिती ✿*
      ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
◆ महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 
       ::~  3,07,713 चौ. कि.मी.

◆ क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक - 
     ::~   तिसरा (राजस्थान व  
      मध्यप्रदेश राज्यानंतर तिसरा)

◆ महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी 
     ::~ 720 कि.मी. 
(काही ठिकाणी ही 700 कि.मी. आहे)

◆ महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला एकूण  ::~  9.36% प्रदेश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

27. *❒ बंकिमचंद्र चटोपाध्याय ❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म नाव :~ बंकिमचंद्र यादवचंद्र
                      चटोपाध्याय
●जन्म :~ २६ जून १८३८
●मृत्यू :~ ८ एप्रिल १८९४
●कार्यक्षेत्र :~ कवी, कादंबरीकार, पत्रकार, डेप्युटी मॅजिस्ट्रेट (पेशा) 
●प्रसिद्धसाहित्य :~वंदे मातरम् हे गीत
    प्रभावित भारतीय स्वातंत्र्यलढा

         ★बंकिमचंद्र चटोपाध्याय★
     हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या "वंदे मातरम्" या गीताचे रचनाकार होते. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

            ◆वन्दे मातरम्◆
     वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगीत हा दर्जा मिळालेला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले.

    भारताचा स्वातंत्र्य लढा १८५७ च्या सशस्त्र क्रांतीपासून सुरू झाला. हा लढा यशस्वी झाला नसला, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे सशस्त्र क्रांतीचे केंद्र बनले. सुखदेव, भगतसिग, चंद्रशेखर आजाद, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या झपाटलेल्या क्रांतिवीरांनी इंग्रजांविरुद्ध ही क्रांतीची मशाल तेवत ठेवली. 

       ◆प्रकाशित साहित्य
कादंबऱ्या :~ दुर्गेशनन्दिनी (१८६५),
कपालकुण्डला (१८६६),मृणालिनी (१८६९), बिषबृक्ष (१८७३), इन्दिरा, युगलाङ्गुरीय़, आनंदमठ (१८८२), 

    वा.गो. आपटे यांनी चार खंडांत, बंकिमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरीवाङ्‌मय, त्यातील बंगाली वातावरण, पार्श्वभूमी व पात्रांची नावे कायम ठेवून मराठीत आणले आहे.

निबंध :~ लोकरहस्य (१८७४), बिज्ञान रहस्य (१८७५), कमलाकान्तेर दप्तर (१८७५), बिबिध समालोचना (१८७६), साम्य (१८७९),
कृष्णचरित्र (१८८६), धर्मतत्त्ब अनुशीलन, श्रीमद्भगबद्गीता (१९०२)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ गुरुवार ~ 27/06/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment