"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *24/07/24 बुधवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

       🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://urlzs.com/dmQmp

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *24. जुलै:: बुधवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ कृ. ३/४, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~तृतीया, नक्षत्र ~शतभिषज, 

योग ~सौभाग्य, करण ~विष्टि, 

सूर्योदय-06:11, सूर्यास्त-19:17,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂*

 ┅━▣◆★✪★◆▣━┅


24. *केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


24. *दे रे हरी पलंगावरी*

      ★ अर्थ ::~ काही लोकांना काहीच श्रम नं करता आपल्याला सगळं मिळावं असं वाटत असतं. कर्म नं करता फळाची आशा बाळगणे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


24. *ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः ।*  

      ⭐अर्थ ::~ एकी (संघटितपणा) हे समाजाचे बळ असून ऐक्याच्या अभावी समाज दुर्बळ ठरतो.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


        🛡 *24. जुलै* 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील २०५ वा (लीप वर्षातील २०६ वा) दिवस आहे.


     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●२०२२: वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिप भालाफेक मध्ये नीरज चोप्रा यांनी 88.13मीटर भाला फेकून सिल्वर मेडल जिंकले.

●१९९७ : माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्‍च नागरी सन्मान भारतरत्‍न प्रदान

●१९९७ : ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

●१९९१ : अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा? अर्थसंकल्प संसदेत सादर केला.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९४५ : अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ’विप्रो’ (WIPRO) चे चेअरमन

◆१९२८ : केशुभाई पटेल – गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य

◆१९११ : अमल ज्योती तथा ’पन्‍नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार 

◆१९११ : गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी 


   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९८० : अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते 

●१९८० : पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक 

●१९७४ : सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल ●१९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


24.  *✸ गाउ त्यांना आरती ✸*

   ●●●●००००००●●●●

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती

राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाउ त्यांना आरती


कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले

संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाउ त्यांना आरती


स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती

आप्‍तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाउ त्यांना आरती


देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो

आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाउ त्यांना आरती


देह जावो, देह राहो, नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती

आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाउ त्यांना आरती


जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने

कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाउ त्यांना आरती


नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना

बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृति, गा तयांची आरती."

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


24. *❂ असे मी अनादी ❂*

  ━━●✶✹★●★✹✶●═━

असे मी अनादी मला अंत नाही

मला मृत्युची या मुळी खंत नाही

पडू दे इथे ही तनू मृण्मयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥१॥


आम्ही प्राशिले मत्त त्या सागराला

आम्ही प्राशिले कालकूटा गराला

असे वीर्य ते माझिया संचयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥२॥


जिथे न्याय -निती सवे सत्य आहे

जयाची पताका तिथे नित्य आहे

उभा देव तेथे सदा निश्चयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥३॥


पुन्हा यज्ञि या द्यावया आहुती मी

पुन्हा जन्म घेइन रे भारती मी

असे येथली वीरता अक्षयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे॥४॥


इथे वाहता धार ही शोणिताची

पहा जागली अस्मिता भारताची

उभी सिध्द सेना पहा ती जयी रे

चिरंजीव मी वीर मृत्युजयी रे॥५॥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


24.     *❃ उपयोगी जीवन ❃*

━━•●◆●★◆★●◆●•━━  

         एके वेळी काही मजुर दगडाच्या खाणीत काम करीत असता त्यांनी खडकाचा अर्धा भाग फोडला, इतक्यात त्या दगडाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडूक उडी मारून बाहेर आला. हे पाहून त्या मजुरांना फार नवल वाटले व ते त्याच्याकडे कौतुकाने पहात उभे राहिले. तो बेडूक त्या दगडाच्या आत कसा जन्मला, कसा जगला याविषयी आपापसात बोलू लागले. 

         त्यांचे बोलणे कानावर पडताच त्या बेडकाला स्वतःविषयी धन्यता व गर्व वाटून तो म्हणाला, 

         'अरे बाबांनो, मागचा प्रलय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर जन्म घेतला तेव्हाच मी जन्मलो. माझ्या बरोबरीचा असा आज एकही प्राणी या जगात नाही. भगवंताचं आणि माझं कूळ एकच. अन मीही त्याच्या सारखाच पुढच्या प्रलयापर्यंत जगणार !' 

           तो असे बोलत आहे, इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली, 

          'बेडका तू फार काळ जगलास आणि तुझा जन्म मोठ्या कुळात झाला असला तरी तुला यात गर्व वाटण्यासारखं काय आहे ? एवढ्या मोठ्या आयुष्याचा तुला काय फायदा ? त्यापेक्षा माझं पहा ? तसं माझं आयुष्य मोठं नाही तरी मी सतत उद्योग करते नि लोकांच्या उपयोगी पडते. नाना प्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग घेता येतो. सर्वांनी आदर्श बाळगावा असं माझं वर्तन आहे. 

        मोठ्या कुळात जन्मून अन् हजारो वर्षे जगून, सारं आयुष्य आळसात आणि अज्ञानात घालवलं तर त्याचा उपयोग काय ?'


         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*  

       खरा मोठेपणा अंगच्या गुणांवर अवलंबून असतो. जीवन जगत असतांना माणसाने सतत दुसऱ्याच्या उपयोगी यावे.यातच खरा आनंद आहे.आयुष्याच सोन होईल.!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


24. *आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात  वेळ दड़वु नका,* 

   *जो क्षण आयुष्यात  येईल त्याला  सुंदर करण्याचा प्रयत्न करा...*

    *जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,,*


   *कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते... आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो...!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


24. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


 ✪  हिमरू शालीकरिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?

  ➜ औरंगाबाद.


 ✪  भारताची प्रथम महिला अर्थमंत्री कोण ?

  ➜ निर्मला सितारामन.


 ✪  महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?

  ➜ ताजमहल. ( मुंबई )


✪  वीरधवल खाडे हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

  ➜ जलतरण.


 ✪  ग्रामोफोनचा संशोधक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

  ➜ थाॅमस एडिसन.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


24. *❒ ♦गोविंदभाई श्रॉफ ❒*  

  ━━•●◆●★◆★●◆●•━━

*●जन्म :~ २४ जुलै १९११*

●मृत्यू :~ २१ नोव्हेंबर २००२


  ◆गोविंददास मन्नुलाल श्रॉफ◆


     हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते एक प्रमुख समर्थक म्हणून गणले जात.


    स्वातंत्र्य लढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातिल व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली आहे.


    बिटिशांकित हिंदुस्थानातील हैदराबाद संस्थानातील जनतेच्या मुक्तिलढयाचे एक नेते व स्वामी रामानंद तीर्थ यांचे निकटचे सहकारी. त्यांचा जन्म विजापूर (कर्नाटक राज्य ) येथे झाला. औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये आले. मॅट्रिकच्या परीक्षेत संस्थानात सर्वप्रथम. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले; परंतु चळवळ थांबल्यामुळे पुन्हा शिक्षण सुरू.


     कार्ल मार्क्सच्या विचारांचे अभ्यासमंडळात अध्ययन. कोलकाता येथील सिटी कॉलेजमधून गणित विषय घेऊन बी.एस्सी. ( ऑनर्स ). पुण्याच्या फर्ग्युसन महाविदयालयातून १९३५ मध्ये त्यांना गोखले स्कॉलर म्हणून गौरविण्यात आले. गणित विषय घेऊन ते एम्.एस्सी. झाले आणि नंतर १९३६ मध्ये त्यांनी एल्एल्.बी. पदवी घेऊन काही काळ औरंगाबादच्या शासकीय विदयालयात अध्यापन केले. याच सुमारास त्यांचा विवाह मुरादाबादच्या मेहता घराण्यातील सत्यवती ऊर्फ सत्याबेन या सुविदय मुलीशी झाला (१९३७). त्यांना डॉ. अजित, डॉ. संजीव व राजीव हे तीन मुलगे असून डॉ. उषा सुरीया या त्यांच्या स्नुषा होत.


     हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. श्री सरस्वती शिक्षण संस्था, औरंगाबाद; स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापिलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि योगेश्वरी शिक्षण संस्था, आंबेजोगाई इ. शिक्षणसंस्थांचे ते एक मार्गदर्शक व पदाधिकारी होते. मराठवाडा खादी ग्रामोदयोग समितीचे संस्थापक तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. मराठवाडयासाठी राज्यघटनेतील तरतुदीनुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याचा आग्रह त्यांनी धरला व त्यात यश संपादन केले (१९७०). मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वेच्या ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


   श्रॉफ यांचे वृद्धापकाळाने औरंगाबाद येथे निधन झाले.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

••◎◑★✹🔅✹★◑◎••

        *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

♦📱7875840444♦

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

█║▌║█❃❂❃█║▌█


*❁बुधवार~24/07/2024❁*

*⋐⋑⛯⋐⋑MSP⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment