"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*05/03/19 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

  *Ⓜ💲🅿 परीपाठ_Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 05/03/2019 ❁*
      *🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🍥 *05. मार्च:: मंगळवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
            माघ कृ. १४
     तिथी : कृष्ण पक्ष चतुर्दशी,
              नक्षत्र : धनिष्ठा,
        योग : शिव, करण : विष्टी,
सूर्योदय : 06:55, सूर्यास्त : 18:45,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

05. *एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05. *डोंगर पोखरून उंदीर कढणे –*
  ★ अर्थ ::~ जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *योजकस्तत्र दुर्लभ: ।*
            ⭐अर्थ ::~
 योजना करणारा (एखाद्या गुणाचा उपयोग करुन घेणारा) दुर्मिळ असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

      🛡 *★05. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ समता दिन
★ हा या वर्षातील ६४ वा (लीप वर्षातील ६५ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण
●१९९७ : ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन
●१९३१ : दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
●१६६६ : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.
●१५५८ : फ्रॅन्सिस्को फर्नाडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१६ : बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री
◆१९१३ : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
◆१५१२ : गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : जलाल आगा – चरित्र अभिनेता
●१९८९ : बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक, गदर पार्टीचे एक संस्थापक
●१९८५ : पु. ग. सहस्रबुद्धे – ’महाराष्ट्र संस्कृती’कार
●१९६८ : नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार
●१९६६ : शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

    https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05.  *✹ने परत मातृभूमीला✹*
        ●●●●●००००००●●●●●
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला ॥घृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।
मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥
तैं जननींहृद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधलें ॥
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणीन ॥
विश्वसलों या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वएं, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला ॥१॥

शुक पंजरि या हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।
दशदिशा तमोमय होती ॥
गुणसुमनें मी वेचियलीं या भावें ।
की तिनें सुगंधा घ्यावे ॥
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा
हा व्यर्थ भार विद्येचा ॥
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आतां । रे
फुलबाग मला, हाय पारखा झाला ।
सागरा, प्राण तळमळला ॥२॥

नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा ॥
प्रासाद इथें भव्य परी मज भारी ॥
आईची झोपडी प्यारी ॥
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा
वनवास तिचाजरि वनिचा
भुलविणें व्यर्थ हे आतां । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पतीईए, जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ॥३॥

या फेनमिषें हंससि निर्दया कैसा ।
कां वचन भंगिसी ऐसा ? ॥
त्वत्स्वामित्या सांप्रत जी मिरवीते ॥
भिउनि कां आंग्लभूमीतें ॥
मम मातेला अबल म्हणुनि फसवीसी
मज विवासनातें देशी ॥
तरि आंग्लभूमि भयभीता ॥रे
अबला न माझि ही माता । रे
कथिल हें अगस्तिस आतां । रे
जो आचमनीं एक क्षणी तुज प्याला ।
सागरा प्राण तळमळला ॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *❂ अविरत पुढे पुढे जाऊ ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥

उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥

शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥

स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥

धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥

सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05.  *❃❝ क्रोधा व संयम ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.

    तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला

    तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

   एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चा बदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

    पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
 "तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
  मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते. हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारातच वसत असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *✿ सामान्य माहिती ✿*
    ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
🔹 *महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत (शिखर)कोणते*?
      ➡   *कळसुबाई* (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

 🔹 *महाराष्ट्राला किती कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?*      ➡   720 कि.मी.

🔹 *महाराष्ट्राने भारताचा कितीटक्के भाग व्यापलेला आहे?*
      ➡    9.7 टक्के.

🔹 *महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या सीमारेषा आहेत?*
      ➡  गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

🔹 *महाराष्ट्रास लागून कोणत्या  राज्याची सीमा सर्वात लांब आहे?*
       ➡    मध्यप्रदेश.

🔹 *विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहेत?*
       ➡    गोंदिया
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05. *❒ ♦डी. प्रकाश राव♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
  पद्मश्री मिळवणारा चहावाला...

    पद्म पुरस्कार मिळणे हे अनेकांच स्वप्न असते. आपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ह्या वर्षी मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराच्या यादीत एक नाव सर्वांपेक्षा वेगळं नाव दिसलं ते म्हणजे डी. प्रकाश राव ( देवारपल्ली प्रकाश राव). डी. प्रकाश राव हे एक चहावाला आहेत. कटक च्या बख्शी बाजारात चहाचं दुकान लहानपणापासून चालवत आहेत. त्यांचे वडील हे दुसऱ्या महायुद्धात सैनिक म्हणून लढले होते. युद्ध संपल्यावर त्यांनी कटक इकडे चहाच दुकान आपली दोन वेळेची भूक भागवण्यासाठी टाकलं. पण दोन वेळेची भूक भागवताना कठीण जायला लागलं. त्यामुळे तरुण असणाऱ्या डी. प्रकाश राव ह्यांना आपलं शिक्षण मॅट्रिकच्या आधी सोडून आपल्या वडिलांना चहाच्या दुकानात मदत करणं भाग पडलं.

     आज ५० वर्षापेक्षा जास्त काळ डी. प्रकाश राव चहाचं दुकान चालवतात. रोज सकाळी ४ वाजता उठून ते चहा विक्री सुरु करतात. पण त्यांचा खरा दिवस उजाडतो तो सकाळी १० नंतर. जेव्हा डी. प्रकाश राव शाळेत जातात ते गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. आजूबाजूच्या झोपडपट्टी वस्तीतील ८० पेक्षा जास्त ४ ते ९ वयोगटातील मुले आज त्यांच्याकडे शिक्षण घेतं आहेत. आपलं शिक्षण अर्धवट झाल्याची सल त्यांच्या मनात अनेक वर्ष रुतून होती. आजूबाजूला गरीब लहान मुलांसाठी शाळा नाही हे त्यांच्या लक्षात आलं मग २००० साली त्यांनी एक ‘आशा आश्वासन’ नावाची लहान शाळा उघडली. आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लोकांना त्यांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी जागरूक केलं. त्यांनी आपल्या पैशातून काही शिक्षकांची नियुक्ती केली. स्वतः ही त्या मुलांना शिकवण्याचं शिवधनुष्य उचललं. ही शाळा सध्या तिसरी इयत्तेपर्यंत आहे. नंतर ते ह्या मुलांना पुढच्या शिक्षणासाठी सरकारी शाळेत प्रवेश घेऊन देतात.

     आपल्या कमाईचा ५०% हून अधिक हिस्सा डी. प्रकाश राव ह्या मुलांवर खर्च करतात. ज्यात मुलाचं शिक्षण, त्याचं आरोग्य, त्याचं जेवण ह्या सगळ्यांचा समावेश आहे. मॅट्रिकच्या आधीच शाळा सोडलेले डी. प्रकाश राव ह्यांना ८ भाषेचं ज्ञान आहे. ज्यात ओडिया, इंग्रजी, हिंदी, तेलगु, तमिळ, कनडा, मल्याळम आणि बंगाली भाषा येतात. त्याचं हे कार्य इथवर मर्यादित नाही तर डी. प्रकाश राव हे रक्तदाता आहेत. आजवर त्यांनी २१४ पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलं असून १७ वेळा प्लेटलेट दान केल्या आहेत. ह्या मागची प्रेरणा काय हे सांगताना ते सांगतात, “वयाच्या १७ व्या वर्षी एका आजारामुळे मी थोडा अधू झालो होतो. तेव्हा अशाच एका निनावी माणसाने रक्त दिल्यामुळे माझे प्राण वाचले. तेव्हाच मी शपथ घेतली कि मी जमेल तितकं रक्तदान करणार”. डी. प्रकाश राव त्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या मृत्यूनंतर शरीराचे अवयव आणि आपलं पूर्ण शरीर हे दान करण्याचा संकल्प केला आहे.

     त्यांच्या कार्याची दखल खुद्द भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी घेतली. डी. प्रकाश राव सांगतात कि एक दिवस पंतप्रधान कार्यालयातील एक अधिकारी माझ्या भेटीला आला. देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला भेटायचे आहे तेव्हा आपण वेळ कधी देऊ शकता असे विचारत होता. तेव्हा हे सगळं माझ्यासाठी अविश्वसनीय असं होतं

 डी प्रकाश रावांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

"I could not believe when an officer from the PMO requested me to give time for a meeting with PM. My happiness knew no bounds when I finally met Modi."

    डी. प्रकाश राव ह्यांच्या निस्वार्थी कार्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके प्रभावित झाले कि त्यांनी आपल्या ‘मन कि बात’ ३० मे २०१८ च्या कार्यक्रमात त्यांचा उल्लेख केला. एक साधा चहा विकणारा विक्रेता ठरवलं तर काय करू शकतो ह्याचा आदर्श डी. प्रकाश राव ह्यांनी संपूर्ण देशापुढे ठेवला आहे. कितीतरी गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं पवित्र काम त्यांनी केलेलं आहे.

    त्यांच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी हे शिक्षणात हि चमक दाखवत आहेत. अनेक विद्यार्थी शाळेत पहिले येत आहेत तर 'महेश राव ' ह्या एका विद्यार्थ्याला २०१३ ला गोवा इकडे झालेल्या विंड सर्फिंग स्पर्धेत चक्क ६ सुवर्ण पदक मिळालेले आहेत.

    डी. प्रकाश राव  ह्यांच्या सारख्या निस्वार्थी, सेवाभावी व्यक्तिमत्वाला आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने मला वाटते आज पद्मश्री पुरस्काराचा सन्मान झाला आहे. डी. प्रकाश राव ह्यांच्या कार्यापुढे मी नतमस्तक आणि त्यांच्या पुढील प्रवासाला माझ्याकडून शुभेच्छा..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ मंगळवार ~ 05/03/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment