"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*13/09/23 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *13. सप्टेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
निज श्रावण, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~मघा,
योग ~सिद्ध, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:25, सूर्यास्त-18:43,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

13. *क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

13. *वासरात लंगडी गाय शहाणी–*
  ★ अर्थ ::~ अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

13.  *न मातु: परं दैवतम् ।*
           ⭐अर्थ :: ~
आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★ 13. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक चॉकलेट दिवस
★ हा या वर्षातील २५६ वा (लीप वर्षातील २५७ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.
●१९४८ : ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
●१९२२ : लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°••◆••°°°~°°•••🔸
◆१९६९ : शेन वॉर्न – ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर
◆१९६७ : मायकेल जॉन्सन – अमेरिकन धावपटू
◆१८८६ : सर रॉबर्ट रॉबिनसन –वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते
◆१८५२ : गणेश जनार्दन आगाशे – नामांकित शिक्षक, संस्कृत पंडित, व्युत्पन्न ग्रंथकार, उत्तम वक्ते व इंदूर येथे भरलेल्या १० व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश
●१९९५ : डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष 
●१९२९ : लाहोर कटातील क्रांतिकारक *जतिन दास* यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला. 
●१८९३ : मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/ghuC48
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

13. *✸ "सारे जहाँ से अच्छा" ✸*
   ●●●●००००००●●●●
सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्तान हमारा
हम बुलबुलें हैं उसकी
वो गुलसिताँ हमारा।
परबत वो सबसे ऊँचा
हमसाया आसमाँ का
वो संतरी हमारा
वो पासबाँ हमारा।

गोदी में खेलती हैं
जिसकी हज़ारों नदियाँ
गुलशन है जिनके दम से
रश्क-ए-जिनाँ हमारा।

मज़हब नहीं सिखाता
आपस में बैर रखना
हिंदी हैं हम वतन है
हिंदुस्तान हमारा।
                 - मुहम्मद इक़बाल
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

13.*❂ देह मंदिर चित्तमंदिर ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

13.  *❃❝ दैवी संपत्ती ❞❃*
  ━═•●◆●★★●◆●•═━
    एक म्हातारं जोडप होतं. घरा जवळच्या जागेत भाज्या लावाव्यात म्हणून तन-मन लावून झटत होते. एकदा खणता खणता त्या म्हाता-या माणसाच्या कुदळीला काही तरी लागलं. त्यानं खणून पाहिलं तर ती एक पेटी होती. उघडताच त्यातल्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.
ती म्हातारी स्री म्हणाली,चला,आपण आता श्रीमंत झालो. आपल्या संकटकाळी देवाने आपल्यासाठी मदत पाठवली आहे.

     हे बघ,उगीचचं लाळ घोटू नकोस. ही जागा आपल्या मालकीची नाही. तेव्हा कशावरून देवाने ही संपत्ती आपल्यासाठीच पाठवली अाहे,असे समजायचे ?

     म्हातारा म्हणाला. आपण ही अशीच इथे ठेवू देऊया. जर समज, ही संपत्ती आपल्यासाठीच देवाने पाठवली असेल,तर ती पाठवण्याची व्यवस्थाही तोच करेल.

     पेटी होती त्याच जागी पुन्हा ठेवून ते दोघे तिथून निघून गेले. म्हातारीने ही गोष्ट सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्या सगळ्यांना वाटलं की,म्हातारी काहीतरी थापा मारतेय. त्या गावात एक व्यापारी राहत होता.त्याला संपत्तीची खूप हाव होती त्याचाही तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.पण एकदा खात्री करून घ्यावी या उद्देशाने तो एका रात्री त्या ठिकाणी पोहोचला. त्याने आपल्याबरोबर आपल्या दोन मुलांनाही घेतले.त्या तिघांनी ती पेटी खणून वर काढली. पेटीचे झाकण उघडताच नागाचा फुत्कार त्यांना ऐकू आला. तशी त्यांनी पेटी घाईघाईने बंद केली.आता मात्र व्यापा-याची खात्री पटली की, म्हातारीने आपल्याला फसवण्या साठीच हा डाव टाकला आहे. तेव्हा तिला चांगली अद्दल घडवावी या उद्देशाने त्या तिघांनी ती पेटी दोरखंडाने बांधून ओढत ओढत म्हातारीच्या घराबाहेर आणली व ते निघून गेले.

   सकाळी दरवाजा उघडताच ती पेटी दारात पाहून त्या दोघांनाही आनंद झाला. ती पेटी उघडताच पुन्हा त्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या. त्या पेटीतून तो नाग केव्हाच पसार झाला होता. आता मात्र दोघांची खात्री पटली की, देवाने आपल्यासाठी पाठवलेली ही *दैवी संपत्तीच*  आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

13. *एक पेन चुक करू शकतो...,*
*पण..,   एक पेन्सील कधीच चुक करत नाही.    कारण..*

    *तीचा पार्टनर (खोडरबर) तीच्या सोबत असतो...*
    *तो तिच्या सर्व चुका सुधारतो...*

    *म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा...*
    *जो आपल्या चुका सुधारेल..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
13. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
  ➜ झारखंड.

✪  राजश्री शाहू छत्रपती या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
  ➜जयसिंगराव पवार.

✪  स्वतंत्र भारताचे पहिले खणन कार्य व ऊर्जामंत्री कोण होते ?
  ➜ वी.एन.गाडगीळ.

✪  भंडारा जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
  ➜गोंदिया.

✪  पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते ?
  ➜ सूर्यप्रकाश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

13. *❒ ♦जतीन्द्रनाथ दास ❒* 
   ━━•●◆●★★●◆●•═━
_*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

●जन्म :~ २७ ऑक्टोबर १९०४ , कलकत्ता, ब्रिटिश भारत;
●मृत्यु :~ १३ सप्टेंबर १९२९, लाहौर

◆जतीन्द्रनाथ दास उर्फ जतीन दास◆

    भारतीय प्रसिद्ध क्रांतिकारक मधील एक क्रांतिकारक होते. ज्यांनी भारत देशाच्या आझादी साठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. यांना जतीन दास या नावाने ओळखले जाते. सर्व
क्रांतिकारक यांना "जतीन दा" या नावानेच बोलत असत.
जतीन्द्रनाथ दास 'कांग्रेस सेवादल' मध्ये सुभाषचन्द्र बोस यांचे सहकारी होते. भगत सिंह यांची भेंट झाल्यानंतर
बॉम्ब बनविण्यासाठी आग्रा आले होते.
भगत सिंह व  बटुकेश्वर दत्त यांनी जो बॉम्ब असेंम्बलीवर फेकला होतो तो बॉम्ब जतींद्रनाथ दास यांनीच बनविला होता.

     लाहोर कटाच्या संदर्भात यांना इंग्रजांनी कैद केले.लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्रेसष्टाव्या दिवशी १३ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁मंगळवार ~ 13/09/2023❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment