"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*18/10/18 गुरुवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 18/10/2018 ❂*
       *🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *18. ऑक्टोबर:: गुरुवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             आश्विन शु. ९
     तिथी : शुक्ल पक्ष नवमी,
            नक्षत्र : श्रावण,
     योग : ध्रुति, करण : कौलव,
सूर्योदय : 06:33, सूर्यास्त : 18:14,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *सामर्थ्य हा मनुष्याचा सर्व श्रेष्ठ गुण आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18.   *वरातीमागून घोडे –*
  ★ अर्थ ::~ एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

18. *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
   ⭐अर्थ ::~  सत्य बोलणे हे
   गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *18. ऑक्टोबर* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★  जागतिक रजोनिवृत्ती दिन
★ हा या वर्षातील २९१ वा (लीप वर्षातील २९२ वा) दिवस आहे.

     ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
●१९६७ : सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
१९०६ : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.
●१८७९ : थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना

      ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५० : ओम पुरी – अभिनेता
◆१९३९ : ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी
◆१९२५ : इब्राहिम अल्काझी – नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक
◆१८६१ : ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली.
◆१८०४ : मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) - थायलंडचा राजा

        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : वीरप्पन – चंदन तस्कर
●१९९३ : मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या .
●१९८३ : विजय मांजरेकर – क्रिकेटपटू
●१९०९ : लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष,
●१८७१ : चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18.  *$ देश हीच माता $*
     ════════════
देश हीच माता, देश जन्मदाता
घडो देशसेवा ऐसी बुद्धी दे अनंता

धर्म पंथ नाही आम्हां जात-गोत नाही
मुले माणसाची अम्ही, वंश माणसाई
मनी आमुच्या ना काही न्यूनता, अहंता

खुली ज्ञान-विज्ञानाची, कलांची कवाडे
सुखे लाभ घेऊ त्यांचा शिकू रोज थोडे
उद्या उंच होऊ आम्ही धरू योग्य पंथा

विस्मरू न अम्ही केव्हा ध्येय, देशनिष्ठा
नव्या भारताला देऊ जगी या प्रतिष्ठा
सर्वसाक्षी सर्वागत तू आम्हां यशोदाता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
18. *$ तिमिरातुनी तेजाकडे $*
          ━━━━━━━━━━
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

18.  *सिंह लाडंगा आणि कोल्हा*
         ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, 'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?

    तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.'

    सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.

       *🌀तात्पर्य ::~*
  दुसर्‍याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
18. ''ज्याच्यामुळे चार लोक आपल्याला ओळखतात त्याच्याच पाठीवर वार करायला बघु नका . त्याचा मान राखा आयुष्यात
      खुप पुढे जानार...!!     
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
18. *भारतातील महत्वाची सरोवरे*
       ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
★ *लोणार सरोवर* = महाराष्ट्र
= उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
★ *हुसेनसागर सरोवर* = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
★ *सांबर सरोवर* = राजस्थान
= भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
18.    *संताजी घोरपडे*
      ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
     मराठी राज्यातील कठीण काळ म्हणजे औरंगजेब बादशहाने छत्रपती संभाजी राजांची निर्घृण हत्या केल्यानंतरचा काळ. या काळात औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेला शिवरायांच्या गनिमी काव्याच्या तंत्राने हैराण करणाऱ्या पराक्रमी सरदारामध्ये लखलखतं पान होतं ते सेनापती संताजी घोरपडे यांचं. संताजी घोरपडे यांनी मोगलांना आपल्या मोहिमांनी अशी काही जरब बसवली होती, की मराठी सैन्याविरुद्ध लढण्याची मानसिकताच या सैनिकांनी गमावली होती.

      इतिहासात संताजी यांची नोंद जेवढा पराक्रमी आणि रणधुरंधर अशी आहे, त्याचबरोबर ते शीघ्रकोपी होते अशीपण आहे. राजकारण आणि त्याला लागणारा कावेबाजपणा या माणसाकडे नव्हता. त्याने कायम रणांगण आणि मोहिमा याचा विचार केला. शिवाजीमहाराजांच्या तालमीत तयार झालेल्या या सेनापतीला जहागीर आणि वतनासाठी भांडणे हे कधीच मान्य होण्यासारखे नव्हते; पण त्या वेळचा काळच असा कठीण होता, की राजाराम महाराजांना अशी वतने विविध सरदारांना द्यावी लागली. हे करत असताना कारभाऱ्यांनी आपला स्वार्थही साधून घेतला. सगळा काळच तेव्हा संक्रमणाचा आणि परीक्षा पाहणारा होता; पण या काळात संताजींचे मराठी राज्याशी असलेले इमान कधीही ढळले नाही. परिस्थितीशी कधीही त्यांनी तडजोड केली नाही. कायम आपल्या तत्त्वावर आणि तलवारीच्या बळावर त्यांनी आपला आब राखला. त्यांचा खून झाला, ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठी दुर्दैवाची गोष्ट नव्हती तर ती अखिल मराठी राज्यासाठी दुर्दैवाची ठरली. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्यात इतके टोकाचे मतभेद झाले नसते आणि ही दोन असामान्य माणसे एकत्र राहिली असती तर मराठी राज्याचा इतिहास वेगळा झाला असता आणि भूगोलही बदलला असता; पण तसे होणे नव्हते. जसे पहिल्या बाजीरावाला छत्रपती शाहू यांच्या काळातील कारभाऱ्यांनी छळण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपतींच्या सतर्कतेने तो फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र, संताजी यांच्याबाबतीत तसे होऊ शकले नाही. एकतर कारभारी आणि त्याचे कारस्थान यशस्वी होत होते आणि शेवटी राजाराम महाराज आणि संताजी यांच्यातच इतके गैरसमज निर्माण झाले, की या दोघांमध्ये एकदा युद्धही झाले. राजांचीच गैरमर्जी झाल्यावर संताजींना काळ कठीण न येता तर नवलच. त्याचवेळी परिस्थितीही त्यांच्या बाजूने अनुकूल राहिली नाही. संताजींच्या आयुष्याची शोकांतिका व्हायला वेळ लागला नाही. पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या मराठी सेनानीची अखेर दुर्दैवी आणि करुण झाली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ गुरुवार ~ 18/10/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment