"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*18/12/18 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 18/12/2018 ❂*
       *🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

    https://goo.gl/3xvRti
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *18. डिसेंबर:: मंगळवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
              मार्गशिर्ष शु. १०
      तिथी : शुक्ल पक्ष दशमी,
             नक्षत्र : अश्विनी,
      योग : परिध,   करण : गर,
सूर्योदय : 07:05, सूर्यास्त : 18:04,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18. *गाढवाला गुळाची चव काय –*
  ★ अर्थ ::~ अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *बुद्धिर्यस्य बलं तस्य ।*
      ⭐अर्थ ::~ ज्याच्याजवळ बुद्धी असते तो बलवान ठरतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 18. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
*★ अस्पृश्यता निवारण दिन*
★ हा या वर्षातील ३५२ वा (लीप वर्षातील ३५३ वा) दिवस आहे.
★ अल्पसंख्याक हक्‍क दिन
★International Migrants Day

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९५ : अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
●१९८९ : सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९७८ : डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७१ : बरखा दत्त – पत्रकार
◆१९५५ : विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
◆१८९० : ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
◆१८८७ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’
◆१८७८ : जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
◆१८५६ : सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ 

        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : विजय हजारे – क्रिकेटपटू
●२००० : मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
●१९९५ : कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार
●१९९३ : राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक.
●१९८० : अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *✸ उभवू उंच निशाण ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !

दीन दीन जे, दलित दलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान
उभवू उंच निशाण !

अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान
ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान्‌
शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान

ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान
पुसुनी आसवें मानवतेची होती बुद्ध महान
हे समतेचे, हे ममतेचे, गांधीजीचे गान
हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *❂ दीनबंधु तू गोपाला रे ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18.  *❃❝ वस्तूची उपयुक्तता ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
      एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्‍या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.

       *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    वस्तू लहान असो अथवा मोठी कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठय़ा आकारावरून ठरवायची नसून, तिच्या उपयोगावरून ठरवायची असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18.  आयुष्य म्हणजे 
    अनुभव+ प्रयोग+ अपेक्षा
     यांचे समीकरण आहे.
कालचा दिवस हा "अनुभव" होता.
आजचा दिवस हा "प्रयोग" असतो.
उद्याचा दिवस ही "अपेक्षा" असते.
म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची अपेक्षा पूर्ण करा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

18. *✿ भारतातील राज्ये आणी त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■. छत्तीसगढ --- पंथी

■. राजस्थान --- घूमर

■. पश्चिम बंगाल --- गंभीरा

■. उत्तर प्रदेश --- कथक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ महत्वपूर्ण दिवस ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

18. *❒ अस्पृश्यता निवारण दिन ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एका माणसाने दुसऱ्या माणसाला स्पर्श न करणे म्हणजेच अस्पृश्यता होय. जातीय अस्पृश्यता हा प्रकार भारत आणि भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. जातीय अस्पृश्यतेच्या नियमांनुसार कनिष्ठ जातीतील लोक हे उच्च जातीतील लोकांना स्पर्श करू शकत नाहीत. पेशवाईच्या काळात भारतात अस्पृश्यतेला अमानवी स्वरूप आले होते. अस्पृश्यतेचा उगम मनुस्मृती या ग्रंथातून झाल्याचे मानले जाते.

    जातिअंताबाबत आपल्याकडे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. आर्थिक स्तर बदलला, की आपोआप हे बदलेल, असे डावी मंडळीही म्हणतात. पण, जातिव्यवस्था किती अवैज्ञानिक आहे, हे शिक्षणातून शिकविले जात नाही.

   ◆अस्पृश्यां विरूद्ध हिंसक घटना

२ जून १९३६ साली बाबा साहेब आंबेडकरांनी दलितांना सामोरे जाव्या लागणाऱ्या अन्याय आणि हिंसेचे पुढील शब्दात वर्णन केले होते. : ' सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे , विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे , वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे , स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे , दागदागिने घातल्यामुळे , पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे , जमीन खरेदी केल्यामुळे , जानवे घातल्यामुळे , मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे , पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार , जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते. मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य उच्चवर्णीय लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते ? याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे , या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत , त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते ; ती ही की , तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता , म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे , उंची पोषाख घातल्यामुळे , जानवी घातल्यामुळे , तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे , घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो , उंची पोषाख करतो , तांब्याची भांडी वापरतो , घोड्यावरून वरात नेतो , तो वरच्या वर्गापैकी कुणाचेही नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा ? या रोषाचे कारण एकच आहे ; ते हेच की , अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात , अपवित्र आहात , खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तर कलहाला सुरुवात होते , ही गोष्ट निविर्वाद आहे. '

     १२ नव्हेंबर, २०१२ अस्पृश्यता निवारणात प्रगतीशील समजल्या जाणाऱ्या तामिळनाडू सारख्या राज्यात धर्मापुरी येथे एका सवर्ण मुलीने दलित मुलाशी विवाह केला एवढ्या कारणा करिता मुलीच्या वडीलांनी आत्महत्या केली आणि सवर्ण मुलीच्या वडीलांच्या आत्महत्येचा बदला म्हणून सवर्णांनी तीन दलित वस्त्यातील २६८ झोपड्या जाळल्या. ४० घरांचे पूर्ण आणि १७५ घरांचे अंशत: नुकसान कले गेले ज्याची अंदाजीत किंमत ७ कोटिच्या आसपास असावी. कोडामपट्टी येथील आंतरजातीय विवाह झालेल्या कुंटूंबावर जमावाने हल्ला केला. National Commission for Scheduled Castes चे अध्यक्ष पी एल पुनीया यांच्या म्हणण्यानुसार हल्ला पुर्वनियोजीत पणे केला गेला असावा.

  ◆अस्पृश्यता निवारणाचा लढा
     जयपूरच्या उच्च न्यायालयात मनूचा पुतळा हटविण्यासाठी दोन वेळा सत्याग्रह केला. आता, उलट स्थिती पाहायला मिळते. कारण, मनूचा पुतळा उभारण्याच्या वेळी 17 न्यायाधीश उपस्थित होते. नंतर त्यांच्या लक्षात आले, की आपण मोठी चूक करून बसलो आहोत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ मंगळवार ~ 18/12/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment