"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*18/04/26 शनिवारचा परिपाठ*

❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂

*महाराष्ट्र शिक्षक परिवार*

*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*


 *💲शालेय परिपाठ💲*

❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉

    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    ♦ *प्रतिज्ञा* ♦

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    🇮🇳 *संविधान* 🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*

 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

  🔗🔗👇👇🔗🔗


https://shorturl.at/HqFec

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

 ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 १८. एप्रिल :: शनिवार 🍥

⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺

वैशाख शु.१, पक्ष : शुक्ल पक्ष,

तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~भरणी,

योग ~प्रीति, करण ~बव,

सूर्योदय-06:19, सूर्यास्त-18:56

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂* 

  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━


18. *ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 

••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••


18. *कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडू ते कडूच*

      *★ अर्थ ::~* - वाईट माणसाचा स्वभाव काही केले तरी बदलत नाही.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ▫ सुभाषीत▫*

====••◆◆●★●◆◆◆••====


18. *विद्या गुरूणां गुरु: ।*

      ⭐अर्थ ::~

 विद्या गुरुजनांनाही पूज्य आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ♦दिनविशेष*♦

••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••


    🛡 *★18. एप्रिल★* 🛡

🔻====●●●★●●●====🔻

★ जागतिक वारसा दिन

★ हा या वर्षातील १०८ वा (लीप वर्षातील १०८ वा) दिवस आहे.


    ~*★महत्त्वाच्या घटना★*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००१ : भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण

●१९५० : आंध्र प्रदेशातील तेलंगणा येथील पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

●१९१२ : ’टायटॅनिक’ मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन ’कार्पेथिया’ हे जहाज न्यूयॉर्कला पोचले

●१८५३ : मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸 

◆१९९२: के.एल. राहुल - यष्टिरक्षक-फलंदाज, क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात (कसोटी, वनडे, टी-२०) शतक ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सलामीवीर म्हणून शतक करणारा तो पहिला भारतीय आहे 

◆१९१६ : ललिता पवार – अभिनेत्री 

◆१८५८ : महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न 


     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९९५ : पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक 

●१९७२ : डॉ. पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न  

●१८९८ : दामोदर हरी चापेकर यांना फाशी [चार्ल्स रँड याची हत्या करणारे] (जन्म: २४ जून १८६९)

●१८५९ : १८५७ च्या राष्ट्रीय उठावातील सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा ’तात्या’ टोपे यांना फाशी देण्यात आले. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


18. *✸ बलसागर भारत होवो ✸*

       ●●●●●००००००●●●●●

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो


हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले

राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो


वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन

तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो


हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून

ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो


करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ

विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो


या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ

हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो


ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल

जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*

====••◆◆●★●◆◆◆••====

18.    *❂ प्रभु भक्ति दो। ❂*

       ✶✶✹✹★●★✹✹✶✶

आत्मश्रद्धा से भर जाऊँ, प्रभुवर ऐसी भक्ति दो।

समभावों से कष्ट सहूँ बस, मुझ में ऐसी शक्ति दो॥


कईं जन्मों के कृतकर्म ही, आज उदय में आये है।

कष्टो का कुछ पार नहीं, मुझ पर सारे मंडराए है।

डिगे न मन मेरा समता से, चरणो में अनुरक्ति दो।

समभावों से कष्ट सहूँ बस, मुझ में ऐसी शक्ति दो॥


कायिक दर्द भले बढ जाय, किन्तु मुझ में क्षोभ न हो।

रोम रोम पीड़ित हो मेरा, किंचित मन विक्षोभ न हो।

दीन-भाव नहीं आवे मन में, ऐसी शुभ अभिव्यक्ति दो।

समभावों से कष्ट सहूँ बस, मुझ में ऐसी शक्ति दो॥


दुरूह वेदना भले सताए, जीवट अपना ना छोडूँ।

जीवन की अन्तिम सांसो तक, अपनी समता ना छोडूँ।

रोने से ना कष्ट मिटे, यह पावन चिंतन शक्ति दो।

समभावों से कष्ट सहूँ बस, मुझ में ऐसी शक्ति दो॥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵

••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••


18.  *❃❝ वक्ता आणि श्रोते  ❞❃*

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

    एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   काहीवेळेस आपल्‍या चांगल्या व देशहिताच्‍या योजना लोकांच्‍या गळी उतरविण्‍यासाठी युक्तीप्रयु‍क्तीचा वापर करावाच लागतो.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*

====••◆◆●★●◆◆◆••====


18.   *"सत्य" ही अशी एक श्रीमंती आहे की*,

*जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते*.


    *पण “असत्य" हे असे कर्ज आहे*, *ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं*,

*परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*

====••◆◆●★●◆◆◆••====


18. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  चिपळून शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

➜ वशिष्ठ.


✪  सुयश नारायण जाधव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

➜ पॅराजलतरण.


✪  स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?

➜ ब्युटेन.


✪  राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

➜ ११ मे.


✪  कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

➜ रशिया.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*

••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••


18.  *❒ धोंडो केशव कर्वे ❒*

    ─┅━━●●★◆★●●━━┅─

समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न

   *"यांच्या जयंती निमित्त*

         *विनम्र अभिवादन"*

       🙏🐾🌷🌹🌷🐾🙏


◆टोपणनाव :~ अण्णा

*◆जन्म : ~ १८ एप्रिल१८५८, मुरूड*

◆मृत्यू :~  ९ नोव्हेंबर १९६२

◆चळवळ :~ स्त्री शिक्षण आणि

          सामाजिक सुधारणा

◆पुरस्कार : ~ भारतरत्‍न


   *🔰धोंडो केशव कर्वे🔰*

   महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांनी इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.

   

    ♦स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.


    🔷इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली.

    🔶अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबली करणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.


    ♦अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या. अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी. लिट. देऊन सन्मानित केले. 'पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना *भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्‍न" ने सन्मानित करण्यात आले.* एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.


    🎪आजही 'कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑★✹🔅✹★◑◎●•

   *✍ संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

 ♦📱 7875840444 ♦

 *❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र ❂*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌



 *❁शनिवार ~18/04/2026❁* 

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment