"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

25/04/26 शनिवारचा परिपाठ*

❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂

*महाराष्ट्र शिक्षक परिवार*

*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*


 *💲शालेय परिपाठ💲*

❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉

    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    ♦ *प्रतिज्ञा* ♦

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    🇮🇳 *संविधान* 🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


💎 *सर्वप्रकारची शैक्षणिक माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी...*

 🔘 *"माझी शाळा" ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

  🔗🔗👇👇🔗🔗


https://goo.gl/UWrHm9

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

 ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 २५. एप्रिल :: शनिवार 🍥

⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺

वैशाख शु.९, पक्ष : शुक्ल पक्ष,

तिथि ~नवमी, नक्षत्र ~आश्लेषा,

योग ~शूल, करण ~बव,

सूर्योदय-06:13, सूर्यास्त-18:59

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂* 

  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━


25. *शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 

••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••


25. *कानामागून आली नि तिखट झाली*-   *★ अर्थ ::~* 

   मागून येऊनही प्रसिद्ध पावणे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ▫ सुभाषीत▫*

====••◆◆●★●◆◆◆••====


25. *विनयात् याति पात्रताम् ।*

  ⭐अर्थ ::~ नम्रतेमुळे पात्रता येते.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ♦दिनविशेष*♦

••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••


    🛡 *★25. एप्रिल★* 🛡

🔻====●●●★●●●====🔻

★ जागतिक मलेरिया दिवस

★ हा या वर्षातील ११५ वा (लीप वर्षातील ११६ वा) दिवस आहे.


    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९८३ : पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.

●१९६६ : एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.

●१९५३ : डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध ’नेचर’ मासिकात प्रकाशित झाला.

●१९०१ : स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.

●१८५९ : सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.


    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~

  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९६१ : करण राझदान – अभिनेता, लेखक, दिग्दर्शक

◆१९१८ : शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली)

◆१८७४ : गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक 

◆१२१४ : लुई (नववा) – फ्रान्सचा राजा 


    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~

   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००३ : लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली.

●२००२ : इंद्रा देवी – लाटव्हियाच्या योगशिक्षिका

●१९९९ : पंढरीनाथ रेगे – साहित्यिक 

●१९६८ : बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


25. *✹उठो धरा के अमर सपूतों✹*

        ●●●●●००००००●●●●●

उठो, धरा के अमर सपूतों।

पुन: नया निर्माण करो।

जन-जन के जीवन में फिर से

नव स्फूर्ति, नव प्राण भरो।

नई प्रात है नई बात है

नया किरन है, ज्योति नई।

नई उमंगें, नई तरंगें

नई आस है, साँस नई।

युग-युग के मुरझे सुमनों में

नई-नई मुस्कान भरो।


उठो, धरा के अमर सपूतों।

पुन: नया निर्माण करो।।1।।


डाल-डाल पर बैठ विहग कुछ

नए स्वरों में गाते हैं।

गुन-गुन, गुन-गुन करते भौंरें

मस्त उधर मँडराते हैं।

नवयुग की नूतन वीणा में

नया राग, नव गान भरो।


उठो, धरा के अमर सपूतों।

पुन: नया निर्माण करो।।2।।


कली-कली खिल रही इधर

वह फूल-फूल मुस्काया है।

धरती माँ की आज हो रही

नई सुनहरी काया है।

नूतन मंगलमय ध्वनियों से

गुँजित जग-उद्यान करो।


उठो, धरा के अमर सपूतों।

पुन: नया निर्माण करो।।3।।


सरस्वती का पावन मंदिर

शुभ संपत्ति तुम्हारी है।

तुममें से हर बालक इसका

रक्षक और पुजारी है।

शत-शत दीपक जला ज्ञान के

नवयुग का आह्वान करो।


उठो, धरा के अमर सपूतों।

पुन: नया निर्माण करो।।4।।

           ~ द्वारिका प्रसाद माहेश्वरी

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*

====••◆◆●★●◆◆◆••====


25.*❂ देह मंदिर चित्तमंदिर ❂*

       ✶✶✹✹★●★✹✹✶✶

देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना

सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना

वेदना जाणावयाला जागवू संवेदना

दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना

सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना

सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना

शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना

सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना

मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना

मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना

सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵

••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••


25.  *❃❝ नाम बडे दर्शन छोटे ❞❃*

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

   एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?'


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्‍याच असतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*

====••◆◆●★●◆◆◆••====


25.  माणसाचं जगणं म्हणजे जणू हिंदोळाच..! 

    हळू हळू वेग घेत उन्नतीचा आलेख उंचावत जातो ... 

    आणखी उंच स्वप्न , आणखी उंच भरारी यासाठी माणूस आपली पूर्ण शक्ती एकवटतो... 

    अन् जीवनाचा झोका जेव्हा अगदी आकाशाला गवसणी घालतो तेव्हा या जगण्याच्या खेळाचा निखळ आनंद आपणांस प्राप्त होतो...!! 

     म्हणून जगावं ते हिंदोळ्यासारखं अन् जगणं सजवावं अगदी उंच भरारीच्या स्वप्नांनी..!!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*

====••◆◆●★●◆◆◆••====


25. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?

➜ दहा वर्षांनी.


✪ भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोनते आहे ?

➜ गुजरात.


✪ तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?

➜  दिल्ली.


✪  देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?

➜ गुजरात व महाराष्ट्र.


✪ भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?

➜ छोटा नागपूर.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*

••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••


25.   *❒ तानाजी मालुसरे ❒*

    ─┅━━●●★◆★●●━━┅─      

     छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत शिवाजीबरोबर होते.


       ◆💥तानाजी मालुसरे💥◆


 मृत्यू :~ ४ फेब्रुवारी १६७०,

    सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत


     सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावात तानाजी मालुसरे यांचे बालपण गेले..


                 ◆ कामगिरी ◆

    अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.


      महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले.


      स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.


           ◆कोंढाण्याची लढाई◆

      स्वराज्यासाठी,आऊसाहेबांच्या (जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारी होते. त्यांनी ती तयारी अर्धेवट सोडली आणि जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, 

    ◆"आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."◆


      गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे दिवसा होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्‍न केले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.


     तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्‍या दिवशी शिवाजीराजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना समजले.. महाराज म्हणाले   

   ~"गड आला पण सिह गेला"~. अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठे' (पोलादपूरजवळ) या गावी पाठवले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'वीरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारकसुद्धा उभे केले गेले आहे


         ◆तानाजीची स्मारके◆

     तानाजी मालुसरेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरबीर तानाजी वाडी असे करण्यात आले. पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेंचे स्मारक असून, त्यांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑★✹🔅✹★◑◎●•

   *✍ संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

 ♦📱 7875840444 ♦

 *❂ महाराष्ट्र शिक्षण मित्र ❂*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁शनिवार ~25/04/2026❁* 

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment