"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *03/07/23 सोमवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

  🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


http://satishborkhade.blogspot.com/p/blog-page_551.html

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *03. जुलै:: सोमवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

आषाढ शु., पक्ष :शुक्ल पक्ष,

तिथि ~पौर्णिमा, नक्षत्र ~मूळ, 

योग ~ब्रह्म, करण ~विष्टि, 

सूर्योदय-06:04, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂* 

  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━


03. *प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


03. *दगडा पेक्षा वीट मऊ*

           *★अर्थ ::~* 

 मोठ्या संकटापेक्षा लहान संकट बरे 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅═▣◆★✧★◆▣┅━


03. *सुखं हि दु:खान्यनुभूय शोभते ।*

             ⭐अर्थ ::~

 खूप दु:खे भोगल्यानंतर मिळणारे सुख खरोखर शोभून दिसते. (आनंद देते)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


     *🛡 ★ 03. जुलै ★ 🛡*

🔻===●●●★●●●===🔻

★हा या वर्षातील १८४ वा (लीप वर्षातील १८५ वा) दिवस आहे.


    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~

🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००६ : एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला.

●१९९८ : ’ए मेरे वतन के लोगो ...’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

●१८५५ : भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

●१८५० : इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला ’कोहिनूर’ हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९८० : हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू

◆१९१४ : दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार 

◆१९१२ : श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट 

◆१९०९ : बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 

◆१८८६ : रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, 

◆१८३८ : मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●१९९६ : कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता 

●१३५० : संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ आक्टोबर १२७०)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪★✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

 ━┅━▣◆★✧★◆▣═┅━


03. *✸जय जवान जय किसान*

      ●●●●००००००●●●●

एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान

जय जवान, जय किसान !

जय जवान, जय किसान, जय जय !


अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला

किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला

यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान

जय जवान, जय किसान !


शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा

आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा

उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान

जय जवान, जय किसान !


अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा

भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा

स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान

जय जवान, जय किसान !

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


03. *❂ सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा ❂*

     ━━●✶✹★●★✹✶●━━

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा


शब्दरूप शक्‍ती दे

भावरूप भक्‍ती दे

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा


विद्याधन दे अम्हांस

एक छंद, एक ध्यास

नाव नेई पैलतीरी दयासागरा


हो‍ऊ आम्ही नीतिमंत

कलागुणी बुद्धिमंत

कीर्तिचा कळस जाय उंच अंबरा

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


03. *❝ पुजा-याचे मत परिवर्तन ❞*

  ━═•●◆●★◆★●◆●•━━

       एका गावात एक पुजारी राहत होता. तो रोज देवाची पूजा करत असे. एकदा तो पुजारी अंधविश्वासापोटी देवाला प्रसन्न करण्यासाठी एका बक-याचा बळी देण्याचे ठरवितो. जेंव्हा बक-याला समजते कीं, आपल्याला बळी देण्यात येणार आहे. तेंव्हा एकाचवेळी बकरा अचानक हसायला तर कधी रडायला सुरुवात करतो. बक-याचे असे वागणे पाहून पुजारी संभ्रमात पडतो आणि तो बक-याला विचारतो कीं,  तूं असे का करत आहेस? तेंव्हा बकरा म्हणतो ,  ' मागील एका जन्मी मी देखील पुजारी होतो आणि मीपण असाच हव्यासापोटी एका बक-याचा बळी दिला होता. ते पाप केल्यामुळे मला कित्येक जन्म बक-याचे रूप घेऊन पाप फेडावे लागले.  आज मी पापातून मुक्त होणार आहे. त्यामुळे मी हसत आहे. आता तूं देखील मी जे केले आहे ते करणार आहेस. तुला देखील माझ्याप्रमाणे खुप सारे जन्म असेच दु:ख भोगावे लागेल.  त्यामुळे दयेपोटी माझे हसणे अंश्रूमध्ये रूपांतरीत झाले. पुजा-याला त्याची चूक उमगली. तो बक-याला मुक्त करतो. तो ठरवतो कीं देवाला ध्यानधारणा करूनच प्रसन्न करून घ्यायचे .


         *🌀तात्पर्य ::~*

    *प्राण्यांचा बळी दिल्याने देव प्रसन्न होत नाही.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


03.    एकाच वेळी हजार 

           ध्येये ठेवण्यापेक्षा 

     हजारवेळा एकच ध्येय ठेवा...

       तुम्ही यश तर मिळवणारच 

*पण यशाचा इतिहासही घडवाल..!!*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━

03. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪  आयोडिन या घटकाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?

 ➜गलगंड.


✪  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ कोठे आहे ?

 ➜औरंगाबाद.


✪  मॅग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा कोणती ?

 ➜Mg.


✪  गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात ?

 ➜जयपूर.


✪  सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

 ➜महात्मा फुले

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━═●🇲=◆🇸◆=🇵●═━


07.  *❒ ♦संत नामदेव♦ ❒*  

  ━━•●◆●★◆★●◆●•━━

●जन्म :~ २९ आक्टोबर १२७०

●मृत्यू :~ ३ जुलै १३५०


      हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.


     नामदेव हे ‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.


     भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. 

      *संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.*


     दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय.  संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.


     संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.


      स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.


      संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.


     संत ज्ञानेश्ववरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.


     भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••

            *✍संकलन ✍* 

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║║█❃❂❃█║║█║▌


 *❁ सोमवार ~ 03/07/2023❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment