"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 *03/08/23 गुरूवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*

*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*


 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*


*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*


   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 


    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*

*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*

  🔘 *"माझी शाळा"* 🔘

   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*

    🔗🔗👇👇🔗🔗


https://goo.gl/EXCPbS

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🍥 *03. ऑगस्ट:: गुरूवार* 🍥

 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

अधिक श्रावण, पक्ष :कृष्ण पक्ष, 

तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~धनिष्ठा,  

योग ~सौभाग्य, करण ~तैतिल, 

सूर्योदय-06:15, सूर्यास्त-19:13,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]       ❂ सुविचार ❂* 

  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━


03. *मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●═━


03. *आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे –*  

               ★ अर्थ ::~

   अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━▣◆★✧★◆▣━┅━


03.     *गुरुसेवा गया प्रोक्ता ।*

     ⭐अर्थ :: ~ गुरूंची सेवा गया या तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. (गुरुसेवेने तीर्थक्षेत्री गेल्याचे फळ मिळते.)

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


    🛡 ★ 03. ऑगस्ट ★ 🛡

🔻===●●●★●●●===🔻

★नायजरचा स्वातंत्र्य दिन

★हा या वर्षातील २१५ वा (लीप वर्षातील २१६ वा) दिवस आहे.


         ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९४८ : भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.

●१७८३ : जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५६ : बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू

◆१९०० : *क्रांतिसिंह नाना पाटील* – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार 

◆१८९८ : उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.

◆१८८६ : मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००७ : सरोजिनी वैद्य – लेखिका 

●१९९३ : स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू

●१९५७ : देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव  

●१९३० : व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🚦सतिष बोरखडे दारव्हा*

   💥📱7875840444💥

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂* 

  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


03.  *✹सूरज-सा तिरंगा✹*

        ●●●●●००००००●●●●●

चाँद, सूरज-सा तिरंगा

प्रेम की गंगा तिरंगा

विश्व में न्यारा तिरंगा

जान से प्यारा तिरंगा

सारे हिंदुस्तान की

बलिदान-गाथा गाएगा

ये तिरंगा आसमाँ पर

शान से लहराएगा।


शौर्य केसरिया हमारा

चक्र है गति का सितारा

श्वेत सब रंगों में प्यारा

शांति का करता इशारा

ये हरा, खुशियों भरा है

सोना उपजाती धरा है

हर धरम, हर जाति के

गुलशन को ये महकाएगा।


ये है आज़ादी का परचम

इसमें छह ऋतुओं के मौसम

इसकी रक्षा में लगे हम

इसका स्वर है वंदेमातरम

साथ हो सबके तिरंगा

हाथ हो सबके तिरंगा

ये तिरंगा सारी दुनिया

में उजाला लाएगा।

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


 03. *❂ हे दयाघना शक्ती दे ❂*

       ✶✶✹✹★●★✹✹✶✶

शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना

शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना


तरतम ते उमजेना, उमजेना सत्य

फसविते आम्हांला विश्व हे अनित्य

दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना


 विसरून जर भ्रमले हे चित्त

ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त

निर्भयता जागावी हीच प्रार्थना

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


03.  *❝ पुण्यवान माणस ❞*

   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

     एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती .

आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .

    एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली. ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले .

     अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.

    म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला.

प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हतारीने पैज लावली . बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.

     प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.

     आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.


         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात  पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


03. नाते कितीही वाईट असले तरी ते

     *कधीही तोडू नका;* कारण

  पाणी कितीही घाण असले तरी ते

*तहान नाही पण आग विझवू शकते*

          

    माणुस स्वता:च्या नजरेत 

             चांगला पाहीजे....

        *लोकांच काय , लोक तर*

     *देवात पण चुका काढतात...!!*  

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━▣◆★✧★◆▣═┅━


03. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪ रायगड जिल्हयाचे पूर्वीचे नाव काय होते ?

➜ कुलाबा.


 ✪ रेडिओचा शोध कोणी लावला ?

➜ जी.मार्कोनी.


 ✪ 'कविता आणि माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णन कोणाचे आहे ?

➜ अण्णाभाऊ साठे.


 ✪ महिलांसाठी भाल्याचे वजन किती असते ?

➜ ६०० ग्रॅम.


 ✪ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या विद्यापीठाकडून एम.एस्सी पदवी मिळाली ?

➜ लंडन विद्यापीठ.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*

━━●🇲=◆🇸◆=🇵●━━


03. *❒ क्रांतिसिंह नाना पाटील ❒*  

  ━━•●◆●★◆★●◆●•═━

      हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. 

     *_"यांच्या जयंती निमित्त_*

         *_विनम्र अभिवादन"_*

    🙏🐾🌷🌹🌷🐾🙏


●जन्म : ~ ३ ऑगस्ट  १९००

बहेबोरगाव, पुणे सांगली, महाराष्ट्र,

●मृत्यू : ~ ६ डिसेंबर १९७६ 

             वाळवा येथे

●चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा, 

    संयुक्त महाराष्ट्र चळवळ

   

        "क्रांतिसिंह नाना पाटील"

    महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव.


    नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.


    १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला.

स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.


     ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.


    यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले.


    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

    स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर १९७६ वाळवा मध्ये निधन झाले.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••

            *✍ संकलन ✍*

*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*

   ♦📱 7875840444 ♦

 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*

█║▌║▌║█❂█║▌║█║▌


 *❁ गुरूवार~03/08/2023❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment