"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

केंद्रीय योजनांची माहिती

       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

◆ भारत सरकारची केंद्रीय योजना ◆

★स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया

🔹 प्रारंभ - १६ जानेवारी २०१६

▪️उद्देश - या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय [स्टार्ट अप ] सुरु करण्यासाठी साहाय्य केले जाते.


★ दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना [DDUGKY]

🔹प्रारंभ - २५ सप्टेंबर २०१४

▪️योजनेचा उद्देश - ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणे आहे.


★ प्रसाद [Piligrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive]

🔹 प्रारंभ - ९ मार्च २०१५

▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत अमृतसर, अजमेर, अमरावती, द्वारका, गया, कांचीपुरम, केदारनाथ, कामाख्य, मथुरा, पुरी, वाराणसी, वेल्लकनी, या तीर्थक्षेत्रामध्ये जागतिक दर्जाच्या पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत.

★ उडाण योजना

🔹 प्रारंभ - १४ नोव्हेंबर २०१४

▪️ योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत उच्च तांत्रिक शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन दिले जाते.


★ प्रधानमंत्री उज्वला योजना

🔹 प्रारंभ - १४ नोव्हेंबर २०१४

▪️योजनेचा उद्देश - या योजनेअंतर्गत दारिद्ररेषेखालील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जात आहे.

●~~●~~~~●●~~~~●~~●





●~~●~~~~●●~~~~●~~●
★ नमामि गंगे प्रकल्प

🔹प्रारंभ - १० जुलै २०१४

▪️उद्देश - गंगा नदीचे शुद्धीकरण, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

★ सेतू भारतम प्रकल्प

🔹 प्रारंभ - ४ मार्च २०१६

▪️उद्देश - रेल्वे क्रॉसिंगपासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी आणि २०१९ राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांच्या दुरुस्तीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. 

No comments:

Post a Comment